शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

परभणी : चाराटंचाईकडे कानाडोळा ; कागदोपत्री खेळाने मिळविली शाबासकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:23 IST

तालुका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री खेळ करीत तालुक्यातील चाऱ्याची परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात दाखवून देऊन शबासकी मिळविली; परंतु, चाºयाच्या शोधात उजाडलेला दिवस कधी मावळतो, अशी परिस्थिती तालुक्यातील पशूपालकांची आहे. याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

सत्यशील धबडगे।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : तालुका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री खेळ करीत तालुक्यातील चाऱ्याची परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात दाखवून देऊन शबासकी मिळविली; परंतु, चाºयाच्या शोधात उजाडलेला दिवस कधी मावळतो, अशी परिस्थिती तालुक्यातील पशूपालकांची आहे. याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाउस पडल्याने तालुक्याला गंभीर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून राज्य सरकारने जाहीर केले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्याचबरोबर पशूधनासाठी चाराही मिळाला नाही. उन्हाच्या तीव्रतेसह चाºयाचाही प्रश्न तालुक्यात गंभीर झाला आहे. त्यामुळे पशूधन कसे जगवावे? या चिंतेतून बहुतांश पशूपालक आपले पशुधन विक्रीसाठी काढीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुभती जनावरे सुद्धा विक्रीसाठी बाजारात दिसून येत आहे; परंतु, बाजारात पशुधनास भाव मिळत नसल्याने शेतकºयांपुढे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.वाढत्या उन्हामुळे ओढे, नदी-नाले तलाव कोरडेठाक पडले आहेत. विहीरींनी तळ गाठला आहे. परिणामी पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कार्यालयांमध्ये बसून कागदोपत्री खेळ करीत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादामध्ये तालुक्यात सद्यस्थितीत चारा छावण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे.आता तालुक्यातील विविध १५ गावांतील सरपंचांनी १६ मे रोजी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांची भेट घेऊन आपापल्या गावातील पशुधनासाठी चारा छावणी उभारण्याची स्वतंत्ररित्या मागणी केली आहे. एकीकडे प्रशासन मूबलक चारा आहे, असे सांगत आहे. दुसरीकडे चारा उपलब्ध करुन देण्याची सरपंचानी मागणी केली आहे. त्यामुळे चाºयाच्या या गंभीर प्रश्नापासून प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा, घ्यावा अशी मागणी होत आहे.पंधरा गावातून चारा चाराछावणीची केली मागणी४काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दूरध्वनीवरून तालुक्यातील सरपंचांशी चर्चा केली होती. यावेळी भोसा येथील सरपंच संजय प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गावात चारा छावणी उभारण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मानवत तालुक्यात चाºयाची माहिती घेतली. तहसील प्रशासनाने कृषी विभाग, पशूसंवर्धन विभाग यांच्याशी तसेच गावातील ग्रामस्थांशी चर्चा करुन चारा मूबलक असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठिवला. या अहवालाविषयी माहिती मिळताच तालुक्यातील १५ गावांतील सरपंचांनी आपापल्या गावात चारा टंचाई निर्माण झाली असून चारा छावणी उभारण्याची मागणी केली आहे.या गावातील सरपंचांचा समावेश४तालुक्यातील भोसा, किन्होळा, मगर सावंगी, मानोली, उक्कलगाव, आंबेगाव, थार, रत्नापूर, सोमठाणा, वझुर बु, इरळद, भोसा, पाळोदी, करंजी, पिंपळा या गावातील सरपंचांनी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांची गुरूवारी भेट घेऊन चारा छावणी उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दादा कदम, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, कृऊबाचे उपसभापती पंकज आंबेगावकर, सरपंच सचिन दोडके, सुभाष जाधव, ज्ञानोबा शिंदे, एकनाथ पिंपळे, मुकुंद मगर, सीमा जाधव, महादेव काळे, राजाराम कुकडे, संजय प्रधान, देवराव टरपले, मीरा सुरवसे आदी सरपंच उपस्थित होते.दररोज लागतो : १७२ मेट्रिक टन चारा४मानवत तालुक्यात ३ महसुली मंडळे असून यातील गावांची संख्या ४९ आहे. २०१२ मधील १९ व्या जनगणनेनुसार तालुक्यात एकुण २८ हजार ५८४ पशूधन आहे. यामध्ये मोठे जनावरे २४ हजार ५९८, लहान जनावरे ३ हजार १७, शेळ्या-मेंढ्या ९६९ जनावारांचा समावेश आहे. या पशुधनासाठी प्रतिदिन १७२ मेट्रिक टन चारा लागतो म्हणजेच दर महिन्याला ५ हजार १४५ मेट्रिक टन चारा तालुक्यातील पशुधनासाठी उपलब्ध असणे गरजचे आहे.४त्याचबरोबर एका मोठ्या जनवाराला ३५ ते ४० लिटर पाणी, एका लहान जनावराला १५ ते २० लिटर तर शेळी मेंढीला ३ ते ४ लिटर पाण्याची गरज लागते. दुष्काळी परिस्थितीत पाणी उपलब्ध होणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे जनावरे जगावयची असेल तर प्रशासनाने कागदोपत्री खेळ करणे सोडून देऊन पाण्याचा व चाºयाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी होत आहे.तालुका कृषी अधिकारी, पशुधनविकास अधिकारी, आणि गटविकास अधिकारी यांचे पथक नियुक्त करुन चारा छावणीची मागणी केलेल्या गावात भेटी देउन या बाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात येईल.-डी.डी. फुफाटे,तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळGovernmentसरकार