शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

परभणी : अखेर भुयारी रेल्वे पुलाच्या प्रश्नावर निघाला तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:43 IST

पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़पेडगाव, गव्हा, मोहपुरी, आळंद, पान्हेरा, देवलगाव आवचार, भोगाव साबळेसह १५ ते २० गावांची वाहतूक असलेल्या रेल्वेच्या भुयारी पुलामध्ये पाणी साचत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती़ पावसाळ्यामध्ये हा प्रश्न जटील होणार असल्याने राकाँचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता़ प्रशासनाने दखल घेऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांसमवेत चर्चा घडवून आणली़ यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर, राकाँचे संतोष देशमुख, प्रा़ किरण सोनटक्के, प्रा़ सुरेंद्र रोडगे, मनोज राऊत, सुमंत वाघ, अंबादास सुरवसे, आबासाहेब तायनाक, नवनाथ मेटे, अंबादास मेटे, श्रीधर पाते, बालासाहेब देशमुख आदी उपस्थित होते़तीन तास चर्चारेल्वेच्या भुयारी प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये तीन तास चर्चा झाली़ रेल्वे प्रशासनाचे जालना विभागाचे सुधाकरन, सेक्शन इंजिनिअर हरिशकुमार यांची उपस्थिती होती़ सामान्य नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाने कामे करू नयेत, असे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सुनावले़ त्यानंतर पर्यायी रस्ता तयार करून देणे आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा काढण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेcollectorजिल्हाधिकारी