शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मुळीचा बंधारा कोरडा राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:02 IST

जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरी नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुळी येथे ११.३५ दलघमी क्षमतेचा निम्न पातळी बंधारा बांधला आहे. ८९ कोटी २८ लाख रुपये या कामावर खर्च झाले. मात्र अद्यापपर्यंत या बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. २०११ मध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले. त्यावेळी ५.७२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला. २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. मात्र यावेळी प्रायोगिक तत्वावर बसविलेल्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजांना हानी पोहचली आणि बंधाºयातील संपूर्ण पाणी वाहून गेले होते. त्यानंतर २०१३ आणि २०१४ मध्ये काही प्रमाणात पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ पासून पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आलेल्या पुरात या बंधाºयात ११.३५ दलघमीपेक्षा अधिक पाणी आल्याने दरवाजे निखळून पडले व ते पाण्याने वाहून गेले. त्यामुळे आता बंधाºयातील पाणी वाहून जात असल्याने या बंधाºयात उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पाहणी देखील केली. बंधाºयावर उचल पद्धतीचे दरवाजेच बसविणे योग्य राहील, असा प्रस्तावही तयार करण्यात आला. तो गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत या कामाला प्रारंभ झाला नाही. परिणामी बंधाºयात पाणीसाठा होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी पात्रात पाणी दाखल झाले आहे; परंतु, हे पाणी वाहून जात आहे.१७०५ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायममुळी येथील बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास गंगाखेड तालुक्यातील ८ गावांमध्ये १४७५ हेक्टर आणि सोनपेठ तालुक्यातील तीन गावांमध्ये २३० हेक्टर अशी १७०५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र बंधाºयात पाणीसाठाच होत नसल्याने या शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायम आहे. जलसंपदा विभागाने बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.कागदोपत्री धूळफेकमुळी येथील बंधाºयाचे दरवाजे बंद नसल्याने या बंधाºयात पाणीसाठाच होण्याचा प्रश्न येत नाही. मात्र पाटबंधारे विभागाने मुळी बंधारा १०० टक्के भरल्याची कागदोपत्री दाखवून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याविषयी संताप व्यक्त केला.