शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मुळीचा बंधारा कोरडा राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:02 IST

जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरी नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुळी येथे ११.३५ दलघमी क्षमतेचा निम्न पातळी बंधारा बांधला आहे. ८९ कोटी २८ लाख रुपये या कामावर खर्च झाले. मात्र अद्यापपर्यंत या बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. २०११ मध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले. त्यावेळी ५.७२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला. २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. मात्र यावेळी प्रायोगिक तत्वावर बसविलेल्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजांना हानी पोहचली आणि बंधाºयातील संपूर्ण पाणी वाहून गेले होते. त्यानंतर २०१३ आणि २०१४ मध्ये काही प्रमाणात पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ पासून पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आलेल्या पुरात या बंधाºयात ११.३५ दलघमीपेक्षा अधिक पाणी आल्याने दरवाजे निखळून पडले व ते पाण्याने वाहून गेले. त्यामुळे आता बंधाºयातील पाणी वाहून जात असल्याने या बंधाºयात उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पाहणी देखील केली. बंधाºयावर उचल पद्धतीचे दरवाजेच बसविणे योग्य राहील, असा प्रस्तावही तयार करण्यात आला. तो गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत या कामाला प्रारंभ झाला नाही. परिणामी बंधाºयात पाणीसाठा होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी पात्रात पाणी दाखल झाले आहे; परंतु, हे पाणी वाहून जात आहे.१७०५ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायममुळी येथील बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास गंगाखेड तालुक्यातील ८ गावांमध्ये १४७५ हेक्टर आणि सोनपेठ तालुक्यातील तीन गावांमध्ये २३० हेक्टर अशी १७०५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र बंधाºयात पाणीसाठाच होत नसल्याने या शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायम आहे. जलसंपदा विभागाने बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.कागदोपत्री धूळफेकमुळी येथील बंधाºयाचे दरवाजे बंद नसल्याने या बंधाºयात पाणीसाठाच होण्याचा प्रश्न येत नाही. मात्र पाटबंधारे विभागाने मुळी बंधारा १०० टक्के भरल्याची कागदोपत्री दाखवून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याविषयी संताप व्यक्त केला.