शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परभणीतील शेतकऱ्यांचा रिलायन्स विमा कंपनीविरुद्ध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:54 IST

सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले.

परभणी : सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांच्या संघर्ष समितीच्या वतीने आज दुपारी १ वाजता शनिवार बाजार येथील मैदानातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विमा कंपनीबरोबरच सत्ताधारी शासनाविरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. 

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे. कंपनीने जिल्ह्यातून सोयाबीनच्या विमा हप्त्यापोटी १७३ कोटी रुपये वसूल केले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोयाबीन विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये व सोयाबीन पीक विमा भरपाई द्यावी. 

कापूस, तूर, मूग या पिकांसाठीही विमा भरपाई द्यावी, बोंडअळीचे अनुदान हेक्टरी ४० हजार रुपये अदा करावे, जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध करावा, दुष्काळ जाहीर करण्याचे नवीन निकष रद्द करावेत, कृषीपंपासाठी मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करावा आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन क्षीरसागर व माणिक कदम यांच्य नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMorchaमोर्चाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी