शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

परभणीतील शेतकऱ्यांचा रिलायन्स विमा कंपनीविरुद्ध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:54 IST

सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले.

परभणी : सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांच्या संघर्ष समितीच्या वतीने आज दुपारी १ वाजता शनिवार बाजार येथील मैदानातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विमा कंपनीबरोबरच सत्ताधारी शासनाविरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. 

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे. कंपनीने जिल्ह्यातून सोयाबीनच्या विमा हप्त्यापोटी १७३ कोटी रुपये वसूल केले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोयाबीन विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये व सोयाबीन पीक विमा भरपाई द्यावी. 

कापूस, तूर, मूग या पिकांसाठीही विमा भरपाई द्यावी, बोंडअळीचे अनुदान हेक्टरी ४० हजार रुपये अदा करावे, जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध करावा, दुष्काळ जाहीर करण्याचे नवीन निकष रद्द करावेत, कृषीपंपासाठी मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करावा आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन क्षीरसागर व माणिक कदम यांच्य नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMorchaमोर्चाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी