शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परभणी: आठ गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:09 IST

पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.पूर्णा तालुक्यातील फुकटगाव, खुजडा, कान्हडखेड, हाटकरवाडी, कान्हेगाव, गणपूर, सुकी, ममदापूर या गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान किसान योजनेंतर्गत २ हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. मात्र याच गावांमधील २० टक्के शेतकºयांच्या खात्यावर या योजनेंतर्गत दोन हप्ते जमा झाले आहेत. बहुतांश शेतकºयांना योजनेच्या अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी उसणवारी करुन पेरण्या केल्या आहेत. पावसाने ताण दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक आहे. अनेक भागात पिकांवर किडीचा प्रादूर्भाव होत असल्याने महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.त्यातच शेतकरी अनुदान मिळत नसल्याने या शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकºयांनी पूर्णेच्या तहसीलदारांकडे धाव घेतली असून वरील आठही गावांमधील वंचित शेतकºयांच्या खात्यावर शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पहिला हप्ता जमा करावा, अशी मागणी केली आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाएकीकडे अनुदान न मिळाल्याने शेतकºयांमध्ये उदासीनता असतानाच दुसरीकडे निसर्गही साथ देत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. सद्यस्थितीला पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. मात्र पावसाने १५ दिवसांपासून ताण दिला असून पिके कोमेजून जात आहेत.पोळा सणापूर्वी अनुदान द्याशेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला पोळ्याचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या खरीप हंगामातून शेतकºयांना एकाही पिकातून अद्यापपर्यंत आर्थिक लाभ मिळाला नाही. मूग, उडीद ही पिके कमी कालावधीत हाती येतात. पोळ्यापूर्वी मूग आणि उडदाचे खळे होऊन शेतकºयांना आर्थिक हातभार लागतो. मात्र यावर्षी पावसाअभावी दोन्ही पिकांचे उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे पोळ्याचा सण कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहे. तेव्हा पोळा सणापूर्वी शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर माणिका बोखारे, भीमराव बोखारे, सीताराम बोखारे, बाबुराव बोखारे, गंगाधर बोखारे, मारोती बोखारे, उपसरपंच यशवंत बोखारे आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार