शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी: आठ गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:09 IST

पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.पूर्णा तालुक्यातील फुकटगाव, खुजडा, कान्हडखेड, हाटकरवाडी, कान्हेगाव, गणपूर, सुकी, ममदापूर या गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान किसान योजनेंतर्गत २ हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. मात्र याच गावांमधील २० टक्के शेतकºयांच्या खात्यावर या योजनेंतर्गत दोन हप्ते जमा झाले आहेत. बहुतांश शेतकºयांना योजनेच्या अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी उसणवारी करुन पेरण्या केल्या आहेत. पावसाने ताण दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक आहे. अनेक भागात पिकांवर किडीचा प्रादूर्भाव होत असल्याने महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.त्यातच शेतकरी अनुदान मिळत नसल्याने या शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकºयांनी पूर्णेच्या तहसीलदारांकडे धाव घेतली असून वरील आठही गावांमधील वंचित शेतकºयांच्या खात्यावर शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पहिला हप्ता जमा करावा, अशी मागणी केली आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाएकीकडे अनुदान न मिळाल्याने शेतकºयांमध्ये उदासीनता असतानाच दुसरीकडे निसर्गही साथ देत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. सद्यस्थितीला पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. मात्र पावसाने १५ दिवसांपासून ताण दिला असून पिके कोमेजून जात आहेत.पोळा सणापूर्वी अनुदान द्याशेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला पोळ्याचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या खरीप हंगामातून शेतकºयांना एकाही पिकातून अद्यापपर्यंत आर्थिक लाभ मिळाला नाही. मूग, उडीद ही पिके कमी कालावधीत हाती येतात. पोळ्यापूर्वी मूग आणि उडदाचे खळे होऊन शेतकºयांना आर्थिक हातभार लागतो. मात्र यावर्षी पावसाअभावी दोन्ही पिकांचे उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे पोळ्याचा सण कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहे. तेव्हा पोळा सणापूर्वी शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर माणिका बोखारे, भीमराव बोखारे, सीताराम बोखारे, बाबुराव बोखारे, गंगाधर बोखारे, मारोती बोखारे, उपसरपंच यशवंत बोखारे आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार