शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

परभणी: शेतकरी हा महत्त्वाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:42 IST

शेतकरी संपूर्ण विश्वाला धान्य पुरवठा करुन प्रत्येकाची भूक भागवितो. स्वत: मेहनत करुन धान्य पिकवितो. तो शेतकरी सर्व व्यवस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रथमस्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रमणाचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकरी संपूर्ण विश्वाला धान्य पुरवठा करुन प्रत्येकाची भूक भागवितो. स्वत: मेहनत करुन धान्य पिकवितो. तो शेतकरी सर्व व्यवस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रथमस्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रमणाचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.येथील नांदखेडा रोडवरील देशमुख लेआऊट भागात श्रीश्रीश्री १००८ आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक महोत्सवात १ डिसेंबर रोजी जन्मकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना श्रमनाचार्य विशुद्धसागर महाराज म्हणाले, नेता असो वा साधु-संत, गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच अन्न-धान्याची व्यवस्था करावी लागते. ही जबाबदारी शेतकरी राजा पार पाडतो.शेतकरी पीक खराब होऊ नये म्हणून काळजी घेतो. पिकांची योग्य वाढ व्हावी म्हणून मेहनत घेतो. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करतो. त्यामुळे शेतकरी वर्गास अग्रक्रमांक दिला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रवचनानंतर आरती करण्यात आली. सांस्कृतिक तसेच इतर धार्मिक कार्यक्रमही यावेळी पार पडले. या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त, कार्यकारिणी पंचकल्याणक समिती, युवामंच आणि महिला मंडळांनी प्रयत्न केले.शोभायात्रेने महोत्सवाचा समारोप४परभणी शहरातील नांदखेडा रोड भागात २७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या पंचकल्याणक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यानिमित्त मंगल आरती करण्यात आली. त्यानंतर नांदखेडारोडवरील देशमुख लेआऊट येथून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा नानलपेठ, शिवाजीचौकमार्गे शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. हत्ती, घोडे आदींच्या सहभागामुळे शोभायात्रा आकर्षणाचा विषय ठरली होती. या शोभायात्रेत परभणी शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी