शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

परभणी : घाटांच्या लिलावामुळे वाळूच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:34 IST

जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.गोदावरी, दुधना आणि पूर्णा या प्रमुख नद्यांवर जिल्ह्यात सुमारे ५३ वाळूघाट आहेत. गोदावरी नदीच्या वाळूला मराठवाड्यात मागणी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी मोठी स्पर्धा लागते. मात्र गतवर्षी वाळू घाटांचे लिलाव करण्यास हरित लवादाने परवानगी न दिल्याने तब्बल वर्षभरापासून जिल्ह्यातील वाळूचा अधिकृत उपसा बंद आहे. परिणामी खुल्या बाजारपेठेत वाळू मिळत नसल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम व्यवसाय आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले.वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तरी गोदावरी, पूर्णा या नदीच्या पात्रातून वाळूची चोरी थांबली नव्हती. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा उपलब्ध नसतानाही काही भागातून अनधिकृतरीत्या वाळूची विक्री केली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होत होती. वाळू उपलब्ध नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळूची विक्री केली जात होती. परिणामी जिल्ह्यातील बांधकामे वाळू अभावी ठप्प पडली होती.दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरु केली. त्यापैकी ११ वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून ९ वाळूघाट सद्यस्थितीला अधिकृत वाळू उपसा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे वाळूच्या किंमतीही घसरल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी २० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात होती. सद्यस्थितीला अधिकृत वाळू घाटावरुन १६ हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात आहे. वाळूच्या भावात ४ हजार रुपयांची घसरण झाली असून लिलावात सुटलेल्या घाटांची संख्या वाढल्यानंतर हे भाव आणखी कमी होतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.एकंदर तब्बल वर्षभरानंतर वाळूच्या भावात घसरण झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून रखडलेली बांधकामे पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.या ठिकाणाहून वाळू उपशाला सुरुवात४मानवत तालुक्यातील पार्डी, कुंभारी, वांगी, पालम तालुक्यातील रावराजूर, पाथरी तालुक्यातील मुद्गल, सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी, देऊळगाव आणि मानवत तालुक्यातील सावंगी मगर.आणखी तीन घाटांची प्रक्रिया सुरु४जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाट लिलावासाठी ठेवले असले तरी प्रत्यक्षात १२ घाटांचाच लिलाव सुरु झाला आहे. त्यापैकी ९ वाळूघाट मालकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने हे घाट निविदाधारकांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रत्यक्ष वाळूच्या उपशाला सुरुवात झाली आहे. मात्र पालम तालुक्यातील गुंज, पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या आणि सेलू तालुक्यातील डिग्रस खु. या वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाले असले तरी निविदाधारकांनी अद्यापपर्यंत काही करांचा भरणा केला नाही. त्यामुळे या वाळूघाटातून प्रत्यक्षात वाळू उपसा सुरु झालेला नाही. कर भरुन घेतल्यानंतर लवकरच हे वाळू घाटही निविदाधारकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.परभणी जिल्ह्यात वाळू घाटांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जास्तीत जास्त वाळूघाट लिलावात काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले तर वाळूची निर्माण झालेली टंचाई दूर होऊ शकते. तसेच बाजारपेठेत मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध होऊन सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात वाळू मिळू शकेल.वाळू घाटाचा लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलावधारकाला किमान ३ सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या प्रमुख रस्त्यावर १, वाळू भरण्याच्या भागातील जागा दिसेल या पद्धतीने २ असे तीन कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाळूचे उत्खनन मजुरांमार्फतच करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा आणि वाळू उपशाला लगाम लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग