शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

परभणी : घाटांच्या लिलावामुळे वाळूच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:34 IST

जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.गोदावरी, दुधना आणि पूर्णा या प्रमुख नद्यांवर जिल्ह्यात सुमारे ५३ वाळूघाट आहेत. गोदावरी नदीच्या वाळूला मराठवाड्यात मागणी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी मोठी स्पर्धा लागते. मात्र गतवर्षी वाळू घाटांचे लिलाव करण्यास हरित लवादाने परवानगी न दिल्याने तब्बल वर्षभरापासून जिल्ह्यातील वाळूचा अधिकृत उपसा बंद आहे. परिणामी खुल्या बाजारपेठेत वाळू मिळत नसल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम व्यवसाय आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले.वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तरी गोदावरी, पूर्णा या नदीच्या पात्रातून वाळूची चोरी थांबली नव्हती. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा उपलब्ध नसतानाही काही भागातून अनधिकृतरीत्या वाळूची विक्री केली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होत होती. वाळू उपलब्ध नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळूची विक्री केली जात होती. परिणामी जिल्ह्यातील बांधकामे वाळू अभावी ठप्प पडली होती.दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरु केली. त्यापैकी ११ वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून ९ वाळूघाट सद्यस्थितीला अधिकृत वाळू उपसा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे वाळूच्या किंमतीही घसरल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी २० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात होती. सद्यस्थितीला अधिकृत वाळू घाटावरुन १६ हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात आहे. वाळूच्या भावात ४ हजार रुपयांची घसरण झाली असून लिलावात सुटलेल्या घाटांची संख्या वाढल्यानंतर हे भाव आणखी कमी होतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.एकंदर तब्बल वर्षभरानंतर वाळूच्या भावात घसरण झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून रखडलेली बांधकामे पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.या ठिकाणाहून वाळू उपशाला सुरुवात४मानवत तालुक्यातील पार्डी, कुंभारी, वांगी, पालम तालुक्यातील रावराजूर, पाथरी तालुक्यातील मुद्गल, सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी, देऊळगाव आणि मानवत तालुक्यातील सावंगी मगर.आणखी तीन घाटांची प्रक्रिया सुरु४जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाट लिलावासाठी ठेवले असले तरी प्रत्यक्षात १२ घाटांचाच लिलाव सुरु झाला आहे. त्यापैकी ९ वाळूघाट मालकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने हे घाट निविदाधारकांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रत्यक्ष वाळूच्या उपशाला सुरुवात झाली आहे. मात्र पालम तालुक्यातील गुंज, पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या आणि सेलू तालुक्यातील डिग्रस खु. या वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाले असले तरी निविदाधारकांनी अद्यापपर्यंत काही करांचा भरणा केला नाही. त्यामुळे या वाळूघाटातून प्रत्यक्षात वाळू उपसा सुरु झालेला नाही. कर भरुन घेतल्यानंतर लवकरच हे वाळू घाटही निविदाधारकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.परभणी जिल्ह्यात वाळू घाटांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जास्तीत जास्त वाळूघाट लिलावात काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले तर वाळूची निर्माण झालेली टंचाई दूर होऊ शकते. तसेच बाजारपेठेत मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध होऊन सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात वाळू मिळू शकेल.वाळू घाटाचा लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलावधारकाला किमान ३ सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या प्रमुख रस्त्यावर १, वाळू भरण्याच्या भागातील जागा दिसेल या पद्धतीने २ असे तीन कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाळूचे उत्खनन मजुरांमार्फतच करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा आणि वाळू उपशाला लगाम लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग