शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परभणी : घरकुल बांधकामांवर २९ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:50 IST

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.मागासवर्गीय प्रवर्गातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने नागरी आणि ग्रामीण भागामध्ये रमाई आवास योजना राबविली जाते. २०१० पासून या योजनेचे काम जिल्ह्यात सुरु झाले असून त्या अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, या अर्जांना मंजुरी देणे आणि प्रत्यक्षात घरकुल बांधकाम पूर्ण करुन देणे अशी प्रक्रिया राबविली जाते. घरकुलांसाठी राज्य शासनाकडून अनुदानही दिले जाते. २०१०-११ ते २०१८-१९ या ८ वर्षांमध्ये परभणी जिल्ह्यातील ७ नगरपालिकांना ३ हजार ८२ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८७८ घरकुले बांधून पूर्ण झाली असून ९५० घरकुलांचे बांधकाम सद्यस्थितीला प्रगतीपथावर आहे. या घरकुलांसाठी लाभार्थ्यांना अनुदान म्हणून नगरपालिका प्रशासनाला एकूण ३६ कोटी २८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा निधी घरकुल बांधकामावर खर्च झाला असून अजून ६ कोटी १७ लाख ४६ हजार रुपये शिल्लक आहेत.मानवत नगरपालिकेअंतर्गत ४३९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ११७ घरकुले पूर्ण झाली आहेत. जिंतूर पालिकेत २५० पैकी ७९, पूर्णा पालिकेत ८७७ पैकी ११०, सोनपेठ २४३ पैकी १२२, पाथरी ४२३ पैकी १११, सेलू ३९३ पैकी १३९ आणि गंगाखेड नगरपालिकेमध्ये ४५७ पैकी २०० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.नागरी भागामध्ये घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली असतानाही घरकुल बांधकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जाते; परंतु, प्रत्यक्षात मागील दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यामध्ये वाळूचे भाव गगनाला भिडल आहेत. अनेक भागात वाळू उपलब्ध होत नाही. त्याचाही परिणाम घरकुल बांधकामावर झाला आहे.आठ वर्षातील उद्दिष्टाच्या तुलनेत २८.४८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गोरगरीब लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेला नगरपालिका प्रशासनाने गती देऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.९५० घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर४२०१० पासून ते २०१९ पर्यंतच्या रमाई आवास योजनेतील घरकुल बांधकामाची आकडेवारी प्राप्त झाली असून यावर्षीच्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ९५० घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये मानवत नगरपालिकेअंतर्गत १३३, जिंतूर १३०, पूर्णा २८३, सोनपेठ ४८, पाथरी २२४, सेलू ५४ आणि गंगाखेड शहरात ७८ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक४या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून, त्यात मानवत पालिकेकडे १ कोटी ४१ लाख, जिंतूर पालिकेकडे १ कोटी १५ लाख, पूर्णा पालिकेकडे १ लाख ५६ हजार, सोनपेठ पालिकेकडे ११ लाख २९ हजार, पाथरी पालिकेकडे २ कोटी ७२ लाख, सेलू पालिकेकडे ७५ लाख ५८ हजार रुपये शिल्लक आहेत.पूर्णा शहरात सर्वाधिक निधी खर्च४आतापर्यतच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत पूर्णा शहरामध्ये सर्वाधिक ७ कोटी ५ लाख ९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तर त्या खालोखाल पाथरी शहरात ४ कोटी ३७ लाख १५ हजार रुपये, गंगाखेड शहरात ४ कोटी १६ लाख ५० हजार रुपये.४सेलू शहरात ३ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपये, मानवत शहरात ३ कोटी ८२ लाख ३० हजार रुपये, सोनपेठ शहरात ३ कोटी १३ लाख २१ हजार रुपये आणि जिंतूर शहरात २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघर