शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

परभणी : १६ महिन्यानंतरही कर्जमाफीचे चित्र अस्पष्टच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपले किती रुपयांचे कर्ज माफ झाले, हे स्पष्टपणे आजही शेतकºयांना सांगता येत नसल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपले किती रुपयांचे कर्ज माफ झाले, हे स्पष्टपणे आजही शेतकºयांना सांगता येत नसल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.सातत्याने नैैसर्गिक संकटामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जून २०१७ रोजी राज्यातील ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामध्ये दीड लाख रुपयांची सरसगट कर्जमाफी शेतकºयांना देण्यात आली होती. प्रारंभी कुटुंबातील एका व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा करण्यात आली होती; परंतु, नंतर मात्र यात बदल करुन सातबारा ज्याच्या नावावर आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दीड लाख रुपयांवरील कर्ज असणाºयांनाही त्यांनी त्यांच्याकडील अधिकची रक्कम भरुन दीड रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळविता येईल, असे सांगण्यात आले होते. राज्य शासनाच्या घोषणेनुसार जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार सातबाराधारक शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. या अर्जांमध्ये अनेकवेळा त्रुटी आढळून आल्या. त्यांची दुरुस्ती करण्यात आली; परंतु, ज्यावेगाने योजनेचे काम होणे आवश्यक होते, तसे झाले नाही. परिणामी घोषणेच्या तब्बल १६ महिन्यानंतरही कर्जमाफीचे जिल्ह्यातील चित्र स्पष्ट झाले नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ९७१ शेतकºयांना ८१० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यामध्ये परभणी जिल्हा बँकेतील २७ हजार ९३२ शेतकºयांना ३९ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर ग्रामीण बँकेत खाते असणाºया १८ हजार १७४ शेतकºयांना १२१.१४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.व्यापारी बँकांनी ९५ हजार ५६५ शेतकºयांना ६५०.५२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. ही आॅक्टोबरपर्यंतची आकडेवारी असली तरी आणखी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जांपैकी १ लाख ६४ हजार ५१ अर्जांचा डाटा मॅच होत नसल्याने कर्जखात्याची पूर्नतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ७४ हजार ९३८ कर्जखाते कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित ८९ हजार ६१२ खाते परत बँकेकडे पाठविण्यात आले आहेत.या कर्ज खात्यांची पूर्नतपासणी सुरु असून पात्र शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.३० टक्केच पीक कर्ज वाटप४एकीकडे कर्जमाफीचे काम बँकांकडून मंद गतीने सुरु असताना दुसरीकडे खरीपाचे पीक कर्ज वाटप करतानाही बँकांनी आखडता हात घेतला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी फक्त ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात फक्त २९ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. २०१६-१७ मध्ये मात्र तब्बल १०८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. २०१५-१६ या वर्षात मात्र ६६ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षीचे कर्जवाटप समाधानकारक नसले तरी गतवर्षीची आकडेवारी मात्र बँकांनी ओलांडली आहे.ग्रामीण बँकेची आघाडी४यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेने ७२.७६ टक्के कर्ज वाटप केले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५३.५३ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. व्यापारी बँकांनी मात्र यावर्षी आखडता हात घेतला आहे. या बँकांनी आतापर्यंत फक्त १८.६५ टक्के कर्ज वाटप केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज