शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

परभणी : वृक्षतोड वाढल्याने पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:58 IST

जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत १०१़४८ चौरस किमी म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण क्षेत्राच्या १़६२ टक्के वनक्षेत्र असल्याची २०१७ मध्ये शासन दरबारी नोंद आहे़ जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र हे जिंतूर तालुक्यातच आहे़ इतर तालुक्यांमध्ये मात्र हे वनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मागील काही वर्षामध्ये प्रयत्न झालेले नाहीत़परिणामी झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा या दरम्यानची ३० ते ४० वर्षापूर्वीची झाडे शासनाच्या पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी रस्ता कामाच्या नावाखाली खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून तोडली़ विशेष म्हणजे ही झाडे तोडण्याचे टेंडर काढण्यात आले नव्हते़ ही झाडे वाचविण्याच्या दृष्टीकोणातून पर्यावरण प्रेमींनी पुढाकारही घेतला होता; परंतु, प्रशासकीय पातळीवर उदासिनता दिसून आली़ शिवाय काहींनी त्यामध्ये खोडा घातला़त्यामुळे या झाडांची कत्तल झाली़ अशीच काहीशी परिस्थिती परभणी-गंगाखेड रस्त्यावर पहावयास मिळाली़ या रस्ता कामाच्या नावाखाली जवळपास ८० ते ९० वर्षांपूर्वीची वडाची व इतर झाडे सर्रासपणे तोडण्यात आली़ एक झाड तोडल्यानंतर त्या बदल्यात किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन करावे, असा नियम असताना निगरगट्ट झालेल्या अधिकाºयांनी याकडे लक्षच दिले नाही़परिणामी एकेकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या झाडांमुळे हिरवागर्द दिसणारा हा रस्ता आता मात्र ओसाड झाल्याचे दिसून येत आहे़ या रस्त्यावरील झाडे तोडतानाही पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही़ तशी विचारण्याची तसदीही घेण्यात आली नाही़ परभणी-पाथरी व परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामासाठीही अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळाली़ जिल्हास्तरावर पर्यावरण समिती स्थापन करण्यात आलेली आहे़ परंतु, या समितीची बैठक कधी होते आणि काय निर्णय होतात? हेही कधी समोर आलेले नाही़ त्यामुळे ही समिती कागदावरच आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे़ रस्ता कामांसाठी एकीकडे झाडांची कत्तल सुरू असताना दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील इटोली या एकमेव जंगल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडे तोडली जात असल्याचे गेल्या महिन्यात ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान दिसून आले होते़ त्यानंतरही वन विभागाला या प्रकरणी कारवाई करावीशी वाटली नाही़झाडांची कमी होत असलेल्या संख्येमुळे जिल्ह्याच्या तापमानही मोठी वाढ झाली आहे़ २९ एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च म्हणजे तब्बल ४७ अंश एवढे झाले होते़ आतापर्यंतचे परभणीच्या इतिहासातील हे उच्चांकी तापमान असल्याने आतातरी परभणीकरांना जाग येईल आणि पर्यावरण रक्षणासाठी परभणीकर सरसावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीforestजंगलTemperatureतापमान