शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

परभणी : रोजगार हमीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:50 IST

मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़परभणी जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले़ परिणामी शेतांमध्ये मजुरांसाठी कामे शिल्लक राहिली नाहीत़ शिवाय पीक उत्पादन झाले नसल्याने त्याचा परिणाम मोंढा बाजारपेठेतील कामांवरही झाला आहे़ अशा परिस्थितीत मजुरांना हक्काचे काम उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग कार्यरत आहे़ मात्र मागील काही महिन्यांपासून या विभागात कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांना खाजगी कामांचा शोध घ्यावा लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ३७८ कामे जिल्हाभरात सुरू होती़ या कामांवर २ हजार २७७ मजुरांना काम मिळाले आहे़ जिल्ह्यात कामांची संख्या मर्यादित स्वरुपाची राहत असल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात रोजगार हमी योजना विभागाकडे सुमारे दीड लाख मजुरांनी नोंदणी केली आहे़ या मजुरांना मागेल तेव्हा काम देण्यासाठी हा विभाग कार्यरत करण्यात आला आहे़ मात्र मागील काही महिन्यांपासून कामे वाढत नसल्याने मजुरांना खाजगी कामांकडे वळावे लागत आहे़उपलब्ध माहितीनुसार मागील आठवड्यात ३७८ कामे सुरू होती़ त्यामध्ये ग्रामपंचायतीची २०६ आणि शासकीय यंत्रणांच्या १७२ कामांचा समावेश आहे़ इतर तालुक्यांच्या तुलनेत गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्यांमध्ये रोहयोच्या कामांची संख्या कमी आहे़ पालम तालुक्यात केवळ ७ कामे सुरू होती़ त्यावर ४२ मजुरांना काम मिळाले तर सोनपेठ तालुक्यामधील ५ कामांवर ४० मजुरांना काम मिळाले आहे़ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ९३ कामे सुरू असून, त्यावर ६११ मजुरांना काम मिळाले आहे़ त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ग्रामपंचायतींचीच अधिक कामेरोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणेची कामे मजुरांसाठी उपलब्ध करून दिली जातात़ मात्र शासकीय यंत्रणांच्या तुलनेत ग्रामपंचायतीची कामे अधिक असल्याचे दिसत आहे़ ग्रामपंचायतीची २०६ कामे सुरू असून, त्यात घरकुलाच्या १७१ कामांचा समावेश् आहे़ तर सार्वजनिक विहिरी बांधकाम करण्याची ३५ कामे समाविष्ट आहेत़ ही दोन कामे वगळता रोहयोंतर्गत इतर कामे हाती घेतली नाहीत़ तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेने १७२ कामे उपलब्ध करून दिली आहेत़ त्यामध्ये रेशीम विभागाची तुती लागवड करण्याचे सर्वाधिक १४५ कामे आहेत़ कृषी विभागाच्या अंतर्गत फळबाग लागवडीची २४ आणि वन विभागाच्या अंतर्गत रोप वाटीका लागवडीचे तीन कामे सुरू आहेत़४सामाजिक वनीकरण विभागाने मात्र एकही काम हाती घेतली नाही तर कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे, सीसीटी, व्हर्मी कंम्पोस्ट ही कामे केली जातात़ मात्र ती सुरू नसल्याचे दिसत आहे़आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला़ या हंगामाची सुगी झाली नसल्याने मजुरांना काम मिळाले नाही़ याशिवाय खरीप हंगामातील पीक उत्पादन बाजारपेठेत दाखल झाले नसल्याने त्याचाही फटका मजुरांना सहन करावा लागत आहे़ तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले आणि मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत़ त्यामुळे नदीपात्रातून वाळूचा उपसा बंद पडला आहे़ त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला असून, जिल्ह्यातील हा व्यवसाय ठप्प आहे़ जिल्ह्यात बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कुटूंब इतर व्यवसायात मजुरी शोधत असून, त्यांना दररोज हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे़ अशा परिस्थितीत या मजुरांना रोजगार हमी योजनेने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीLabourकामगार