शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी : दीड कोटीच्या रस्त्याची आठ महिन्यांत चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:16 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे.

तुकाराम सर्जे।लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे.जिंतूर तालुक्यातील मोठे गाव म्हणून कौसडी गावाची ओळख आहे. कौसडी येथील ग्रामस्थांना बाजारहाट, खरेदी-विक्री व दळणवळणासाठी बोरी गाव गाठावे लागते. तसेच कौसडी व बोरी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या सर्व बाबींचा विचार करुन संबंधित सरपंच व लोकप्रतिनिधींनी कौसडी - बोरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. ही मागणी ग्राह्य धरुन राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी देऊन दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यानुसार जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून बोरी- कौसडी रस्त्याचे काम आठ महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले; परंतु, हे काम करीत असताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात आले नाही. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ८ महिनेही उलटले नाहीत, तोच हा रस्ता जागोजागी उखडला आहे. काही ठिकाणी तर हा रस्ता पूर्णत: दबला आहे. या रस्त्याच्या देखभाल दुुरुस्तीसाठी ५ वर्षाचा कालावधी संबंधित गुत्तेदारांना देण्यात आला आहे; परंतु, या गुत्तेदाराचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दीड कोटी रुपये खर्च करुन ८ महिन्यातच रस्ता उखडल्याचे बोरी, कौसडी ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत ?जिंतूर तालुक्यातील बोरी- कौसडी या रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून मंजुरी देण्यात आली. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन देण्यात आला. संबंधित गुत्तेदाराने कामही सुुरु केले. हे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करणे आवश्यक होते; परंतु, अधिकाºयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे केवळ आठ महिन्यातच हा रस्ता उखडला आहे. त्यामुुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या रस्त्याच्या कामाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले की काय, असा संतप्त सवाल कौसडी ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.बोरी- कौसडी हा रस्ता जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्याला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; परंतु, निकृष्ट कामांमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहनधारकांचा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिंतूर विभागाच्या उपअभियंत्याकडे रस्त्याबाबत कौसडी येथील तातेराव बारवकर यांनी तक्रार केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजी