शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

परभणी : दीड कोटीच्या रस्त्याची आठ महिन्यांत चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:16 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे.

तुकाराम सर्जे।लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे.जिंतूर तालुक्यातील मोठे गाव म्हणून कौसडी गावाची ओळख आहे. कौसडी येथील ग्रामस्थांना बाजारहाट, खरेदी-विक्री व दळणवळणासाठी बोरी गाव गाठावे लागते. तसेच कौसडी व बोरी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या सर्व बाबींचा विचार करुन संबंधित सरपंच व लोकप्रतिनिधींनी कौसडी - बोरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. ही मागणी ग्राह्य धरुन राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी देऊन दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यानुसार जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून बोरी- कौसडी रस्त्याचे काम आठ महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले; परंतु, हे काम करीत असताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात आले नाही. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ८ महिनेही उलटले नाहीत, तोच हा रस्ता जागोजागी उखडला आहे. काही ठिकाणी तर हा रस्ता पूर्णत: दबला आहे. या रस्त्याच्या देखभाल दुुरुस्तीसाठी ५ वर्षाचा कालावधी संबंधित गुत्तेदारांना देण्यात आला आहे; परंतु, या गुत्तेदाराचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दीड कोटी रुपये खर्च करुन ८ महिन्यातच रस्ता उखडल्याचे बोरी, कौसडी ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत ?जिंतूर तालुक्यातील बोरी- कौसडी या रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून मंजुरी देण्यात आली. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन देण्यात आला. संबंधित गुत्तेदाराने कामही सुुरु केले. हे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करणे आवश्यक होते; परंतु, अधिकाºयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे केवळ आठ महिन्यातच हा रस्ता उखडला आहे. त्यामुुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या रस्त्याच्या कामाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले की काय, असा संतप्त सवाल कौसडी ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.बोरी- कौसडी हा रस्ता जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्याला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; परंतु, निकृष्ट कामांमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहनधारकांचा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिंतूर विभागाच्या उपअभियंत्याकडे रस्त्याबाबत कौसडी येथील तातेराव बारवकर यांनी तक्रार केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजी