शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

परभणी: पुलाच्या संथ कामामुळे वाहतूक होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:32 IST

तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते काष्टगाव या मार्गावरील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर व कारला ते कुंभारी या रस्त्यावर मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूरही झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा निघून कामास सुरुवात झाली आहे; परंतु, अद्यापही शहापूर ते टाकळी कुंभकर्ण व कारला ते कुंभारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कारला- कुंभारी या रस्त्यावर एका ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. मागील तीन महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु असून सद्यस्थितीत अर्धवट आहे; परंतु, या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच प्रमाणे कुंभारी व कारला येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती याच रस्त्यालगत आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, जेणेकरुन पावसाळ्यात हा रस्ता बंद होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ही बाब बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याने रस्ता व पुलाची कामे संथ गतीने असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.रस्ताही अडकला४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण व शहापूर या साडेचार कि.मी. रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे; परंतु, अद्यापही पूर्णत्वास आले नाही. केवळ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये एक-दोन पाऊस जरी झाला तरी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद होणार आहे.४या रस्त्यावरुन आर्वी, शहापूर, तुळजापूर, वाडी, डिग्रस, कुंभारी बाजार, कारला इ. दहा गावांतील वाहनधारकांची मोठी वर्दळ असते; परंतु, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे चार महिने वाहनधारकांना व प्रवाशांना परभणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी