शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

परभणी: पुलाच्या संथ कामामुळे वाहतूक होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:32 IST

तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते काष्टगाव या मार्गावरील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर व कारला ते कुंभारी या रस्त्यावर मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूरही झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा निघून कामास सुरुवात झाली आहे; परंतु, अद्यापही शहापूर ते टाकळी कुंभकर्ण व कारला ते कुंभारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कारला- कुंभारी या रस्त्यावर एका ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. मागील तीन महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु असून सद्यस्थितीत अर्धवट आहे; परंतु, या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच प्रमाणे कुंभारी व कारला येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती याच रस्त्यालगत आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, जेणेकरुन पावसाळ्यात हा रस्ता बंद होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ही बाब बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याने रस्ता व पुलाची कामे संथ गतीने असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.रस्ताही अडकला४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण व शहापूर या साडेचार कि.मी. रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे; परंतु, अद्यापही पूर्णत्वास आले नाही. केवळ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये एक-दोन पाऊस जरी झाला तरी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद होणार आहे.४या रस्त्यावरुन आर्वी, शहापूर, तुळजापूर, वाडी, डिग्रस, कुंभारी बाजार, कारला इ. दहा गावांतील वाहनधारकांची मोठी वर्दळ असते; परंतु, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे चार महिने वाहनधारकांना व प्रवाशांना परभणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी