शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

परभणी: पुलाच्या संथ कामामुळे वाहतूक होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:32 IST

तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते काष्टगाव या मार्गावरील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर व कारला ते कुंभारी या रस्त्यावर मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूरही झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा निघून कामास सुरुवात झाली आहे; परंतु, अद्यापही शहापूर ते टाकळी कुंभकर्ण व कारला ते कुंभारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कारला- कुंभारी या रस्त्यावर एका ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. मागील तीन महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु असून सद्यस्थितीत अर्धवट आहे; परंतु, या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच प्रमाणे कुंभारी व कारला येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती याच रस्त्यालगत आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, जेणेकरुन पावसाळ्यात हा रस्ता बंद होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ही बाब बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याने रस्ता व पुलाची कामे संथ गतीने असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.रस्ताही अडकला४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण व शहापूर या साडेचार कि.मी. रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे; परंतु, अद्यापही पूर्णत्वास आले नाही. केवळ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये एक-दोन पाऊस जरी झाला तरी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद होणार आहे.४या रस्त्यावरुन आर्वी, शहापूर, तुळजापूर, वाडी, डिग्रस, कुंभारी बाजार, कारला इ. दहा गावांतील वाहनधारकांची मोठी वर्दळ असते; परंतु, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे चार महिने वाहनधारकांना व प्रवाशांना परभणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी