शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

परभणी : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:31 IST

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत शासनाकडून कामे मंजूर करून घेतली़ जवळपास एक वर्षापासून या रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले; परंतु, परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर, आर्वी फाटा ते गोविंदपूर वाडी, कुंभारी बाजार ते कारला आदी गावांतील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे़ मंगळवार, बुधवारी पावसाच्या सरी कोसळल्या़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़ येत्या महिनाभरात या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर या मार्गावरील गावांचा संपर्क तुटणार आहे़ त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच वाहनधारकांचीही मोठी गैरसोय होणार आहे़ गेल्या सात-आठ महिन्यांपासून या रस्त्यांची कामे सुरू असताना अद्यापही संबंधित गुत्तेदारांकडून ही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत़ ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागाकडे रस्त्यांची कामे जलदगतीने करावेत, यासाठी तक्रारी केल्या; परंतु, याचे कोणतेही सोयरसूतक बांधकाम विभागाला नसल्यामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होणार आहे़ त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली व अर्धवट असलेली कामे तत्काळ पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे; परंतु, आतापर्यंतचा बांधकाम विभागाची कार्यपद्धती पाहता ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़महामार्गाचीही कामेही मंदगतीनेच४जिल्ह्यातील परभणी-गंगाखेड, परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी- वसमत या चारही महामार्गाची कामे सद्यस्थितीत अर्धवट अवस्थेत आहेत़४पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत़४त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूकही पूर्णत: कोलमडणार आहे़ परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत पाहत आहे़४त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्याला जोडणाºया महामार्गांचीच कामे अपूर्ण असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत न बोललेच बरे़४विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक