शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:31 IST

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत शासनाकडून कामे मंजूर करून घेतली़ जवळपास एक वर्षापासून या रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले; परंतु, परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर, आर्वी फाटा ते गोविंदपूर वाडी, कुंभारी बाजार ते कारला आदी गावांतील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे़ मंगळवार, बुधवारी पावसाच्या सरी कोसळल्या़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़ येत्या महिनाभरात या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर या मार्गावरील गावांचा संपर्क तुटणार आहे़ त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच वाहनधारकांचीही मोठी गैरसोय होणार आहे़ गेल्या सात-आठ महिन्यांपासून या रस्त्यांची कामे सुरू असताना अद्यापही संबंधित गुत्तेदारांकडून ही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत़ ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागाकडे रस्त्यांची कामे जलदगतीने करावेत, यासाठी तक्रारी केल्या; परंतु, याचे कोणतेही सोयरसूतक बांधकाम विभागाला नसल्यामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होणार आहे़ त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली व अर्धवट असलेली कामे तत्काळ पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे; परंतु, आतापर्यंतचा बांधकाम विभागाची कार्यपद्धती पाहता ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़महामार्गाचीही कामेही मंदगतीनेच४जिल्ह्यातील परभणी-गंगाखेड, परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी- वसमत या चारही महामार्गाची कामे सद्यस्थितीत अर्धवट अवस्थेत आहेत़४पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत़४त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूकही पूर्णत: कोलमडणार आहे़ परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत पाहत आहे़४त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्याला जोडणाºया महामार्गांचीच कामे अपूर्ण असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत न बोललेच बरे़४विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक