शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : निधी मिळत नसल्याने रखडली कर्जप्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:39 IST

येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही.मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी शासन वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देते. या कर्जाच्या माध्यमातून मागासवर्गीय प्रवार्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा, असा हेतू असतो. मात्र मागील काही वर्षांपासून या महामंडळांनाच घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे कार्यालय परभणीत कार्यरत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना कमीत कमी ५० हजार ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. बिजभांडवल योजनेअंतर्गत दिलेल्या या कर्जासाठी महामंडळाकडून सबसिडी दिली जाते. कर्ज रक्कमेच्या २५ टक्के रक्कम महामंडळ अदा करते आणि त्यानंतरच बँकेमार्फत लाभार्थ्याला कर्ज मिळते. उर्वरित रकमेची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे.राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी महामंडळाकडे अर्जही केले. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने या अर्जांना मंजुरीही दिली. मात्र वरिष्ठ स्तरावरुन सबसिडीची रक्कमच स्थानिक प्रशासनाला मिळाली नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व कर्ज प्रकरणे रखडली आहेत. वसंतराव नाईक महामंडळातून मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षांपासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप झाले नाही. २०११-१२ मध्ये ४८, २०१२-१३ मध्ये ४४, २०१३-१४ मध्ये ६४, २०१४-१५ मध्ये २५, २०१५१६ मध्ये ४५, २०१६-१७ मध्ये २३ आणि २०१७-१८ मध्ये २७ असे सात वर्षात सुुमारे २७६ लाभार्थ्यांचे कर्जाचे प्रस्ताव रखडले आहेत. या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यासाठी महामंडळाला ७६ लाख ९८ हजार ५४२ रुपयांची आवश्यकता आहे. महामंडळ प्रशासनाकडून वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा करुनही ही रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत.कारभाराची चौकशी करण्याची मागणी४परभणी जिल्ह्यात मागील सात वर्षांपासून कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे या सात वर्षांच्या काळात किती प्रस्तावांना मंजुरी मिळाली, महामंडळाने किती जणांना कर्ज वाटप केले, वरिष्ठ स्तरावरुन आतापर्यंत किती निधी आला, याची चौकशी करावी. तसेच तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांच्या कारभाराचीही चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.पाच महिन्यांपासून व्यवस्थापकाचे पद रिक्तयेथील वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मागील पाच महिन्यांपासून जिल्हा व्यवस्थापकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामे रखडली आहेत. लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याने निधीसाठी पाठपुरावा करताना अडचणी येत आहेत. कायमस्वरुपी जिल्हा व्यवस्थापकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.लाभार्थ्यांच्या वाढल्या चकरा४वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्ज प्रकरणे मंजूर केल्याने लाभार्थ्यांच्या चकरा वाढल्या आहेत. हे लाभार्थी कधी महामंडळाच्या कार्यालयात तर कधी बँकेत चकरा मारत आहेत. सबसिडी मिळत नाही तोपर्यंत कर्ज मंजूर होणार नाही, असे बँकेतून सांगितले जात आहे तर महामंडळाच्या कार्यालयात गेल्यानंतर सबसिडीची रक्कम आली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार