शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणी : निधी मिळत नसल्याने रखडली कर्जप्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:39 IST

येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही.मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी शासन वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देते. या कर्जाच्या माध्यमातून मागासवर्गीय प्रवार्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा, असा हेतू असतो. मात्र मागील काही वर्षांपासून या महामंडळांनाच घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे कार्यालय परभणीत कार्यरत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना कमीत कमी ५० हजार ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. बिजभांडवल योजनेअंतर्गत दिलेल्या या कर्जासाठी महामंडळाकडून सबसिडी दिली जाते. कर्ज रक्कमेच्या २५ टक्के रक्कम महामंडळ अदा करते आणि त्यानंतरच बँकेमार्फत लाभार्थ्याला कर्ज मिळते. उर्वरित रकमेची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे.राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी महामंडळाकडे अर्जही केले. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने या अर्जांना मंजुरीही दिली. मात्र वरिष्ठ स्तरावरुन सबसिडीची रक्कमच स्थानिक प्रशासनाला मिळाली नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व कर्ज प्रकरणे रखडली आहेत. वसंतराव नाईक महामंडळातून मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षांपासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप झाले नाही. २०११-१२ मध्ये ४८, २०१२-१३ मध्ये ४४, २०१३-१४ मध्ये ६४, २०१४-१५ मध्ये २५, २०१५१६ मध्ये ४५, २०१६-१७ मध्ये २३ आणि २०१७-१८ मध्ये २७ असे सात वर्षात सुुमारे २७६ लाभार्थ्यांचे कर्जाचे प्रस्ताव रखडले आहेत. या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यासाठी महामंडळाला ७६ लाख ९८ हजार ५४२ रुपयांची आवश्यकता आहे. महामंडळ प्रशासनाकडून वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा करुनही ही रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत.कारभाराची चौकशी करण्याची मागणी४परभणी जिल्ह्यात मागील सात वर्षांपासून कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे या सात वर्षांच्या काळात किती प्रस्तावांना मंजुरी मिळाली, महामंडळाने किती जणांना कर्ज वाटप केले, वरिष्ठ स्तरावरुन आतापर्यंत किती निधी आला, याची चौकशी करावी. तसेच तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांच्या कारभाराचीही चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.पाच महिन्यांपासून व्यवस्थापकाचे पद रिक्तयेथील वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मागील पाच महिन्यांपासून जिल्हा व्यवस्थापकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामे रखडली आहेत. लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याने निधीसाठी पाठपुरावा करताना अडचणी येत आहेत. कायमस्वरुपी जिल्हा व्यवस्थापकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.लाभार्थ्यांच्या वाढल्या चकरा४वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्ज प्रकरणे मंजूर केल्याने लाभार्थ्यांच्या चकरा वाढल्या आहेत. हे लाभार्थी कधी महामंडळाच्या कार्यालयात तर कधी बँकेत चकरा मारत आहेत. सबसिडी मिळत नाही तोपर्यंत कर्ज मंजूर होणार नाही, असे बँकेतून सांगितले जात आहे तर महामंडळाच्या कार्यालयात गेल्यानंतर सबसिडीची रक्कम आली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार