शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:39 IST

शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़शहरातील जायकवाडी परिसरात यशोधननगर असून, याच भागात रविराज पार्क पार्वतीनगर ही वसाहत आहे़ दोन्ही वसाहतींमध्ये साधारणत: एक ते दीड हजार कुटूंबिय वास्तव्याला आहेत़ या दोन वसाहतींबरोबरच या परिसरातील इतर वसाहतींसाठी महापालिकेने केवळ एका टँकरचे नियोजन केले आहे़ टँकरचे पॉर्इंटही नेमून दिले आहेत; परंतु, टँकर येण्याची वेळ निश्चित नसल्याने येथील नागरिकांची तारांबळ होते़ यशोधननगर भागात १० दिवसानंतर बुधवारी टँकर दाखल झाले़ त्यामुळे टँकरचे पाणी भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.यशोधननगर परिसरामध्ये जलवाहिनी टाकली आहे; परंतु, या जलवाहिनीला जोडणी दिली नाही़ लोकमान्यनगर भागातील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह टाकल्यानंतर नळाद्वारे यशोधननगराला पाणी उपलब्ध होऊ शकते़ महापालिकेने पुढाकार घेतला तर या भागातील पाण्याची समस्या निकाली निघू शकते़; परंतु, जलवाहिनी टाकूनही अद्याप पाणीपुरवठा सुरू केला नसल्याने येथील नागरिकांना टंचाईचा सामन करावा लागत आहे़ नळ योजना नाही, हातपंपांचे पाणी आटले आहे़ अशा परिस्थितीत या नागरिकांची संपूर्ण भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे; टँकरही बेभरोस्याचे असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत़ नियमित टँकर येत नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा करावा लागतो़ त्यानंतर कुठे टँकरचे पाणी मिळत आहे़ मनपाने या भागात जलवाहिनीचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि येथील समस्या निकाली काढावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ याच परिसरातील रविराज पार्क, पार्वतीनगर या भागाचीही अशीच समस्या आहे़ रविराज पार्क परिसरात जलकुंभ उभारणीचे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे, या भागातही महापालिकेने जलवाहिनी टाकली आहे़ मात्र या जलवाहिनीला पाणी उपलब्ध करून दिले नाही़परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मार्च महिन्यामध्येच रविराज पार्क भागातील हातपंप आटले आहेत़ या भागातही सहा ते सात दिवसांतून एक वेळा टँकरचे पाणी येत असून, सुमारे १ हजार कुटूंबियांसाठी केवळ १२ हजार लिटरचे एकच टँकर पाठविले जाते़ या टँकरच्या दिवसभरातून पाच फेऱ्या होत असल्या तरी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही़ एका वेळेला केवळ ५०० लिटर पाणी मिळते़ हे पाणी जास्तीत जास्त दोन दिवस पुरते़ त्यामुळे मनपाने टँकरची संख्या वाढवावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे़जलकुंभावर जाऊन आणावे लागते टँकर४यशोधननगर, रविराज पार्क या दोन्ही भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ मनपाच्या टँकरचे नियोजन नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जातो़ थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन एक जण टँकरसोबत दिल्यासच ते टँकर वसाहतीपर्यंत पोहचते आणि तेव्हा कुठे नागरिकांना पाणी उपलब्ध होते़ प्रत्येक वेळी अशाच प्रकारे पाठपुरावा केल्यानंतरच टँकर मिळते़ त्यामुळे टंचाईत भर पडली आहे़४महापालिकेचे टँकरचे नियोजन नसल्यानेच परिसरामध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे़ टँकरच्या सहाय्याने किमान तीन दिवसांआड मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला तर नागरिकांची समस्या दूर होऊ शकते़; परंतु, हे नियोजन विस्कळीत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़४टँकरच्या सहाय्याने मिळणारे पाणी सांडपाण्यासाठी वापरले जाते़ पिण्यासाठी मात्र विकतच्या पाण्यावरच येथील नागरिकांची भिस्त आहे़ त्यामुळे टंचाई परिस्थितीमध्ये पाण्यावरील खर्च वाढला आहे़ प्रभागात टँकर पोहचल्यानंतर पाणी वितरित करीत असताना अनेक नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे पाण्यावरून वादाचेही प्रकार घडत आहेत़ मनपाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़मागील महिनाभरात टँकरने केवळ तीन वेळा पाणी मिळाले़ १० दिवसांतून एक वेळा टँकर येत असल्याने पाण्यासाठी ओढाताण होत आहे़ या भागातील बोअर आटल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ मनपाने टँकरची संख्या वाढवावी़-रामचंद्र शिंदे, नागरिकबोअरचे पाणी आटले असून, १५-१५ दिवस टँकरचे पाणी मिळत नाही़ आमच्या भागात नळ नाहीत़ त्यामुळे पाणी संपल्यानंतर दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे़ मागील काही दिवसांपाूसन ही परिस्थिती निर्माण झाली आहे़-शिवनंदा मिरसगावे, नागरिक१५ दिवसांपर्यंत टँकर येत नाही़ नळ योजना नसल्याने पाण्याची खूपच समस्या निर्माण झाली आहे़ या भागात जलकुंभाचे काम सुरू आहे़ ते पूर्ण करून जलवाहिनीच्या माध्यमातून परिसराला त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे़-मीनाबाई चव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई