शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:39 IST

शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़शहरातील जायकवाडी परिसरात यशोधननगर असून, याच भागात रविराज पार्क पार्वतीनगर ही वसाहत आहे़ दोन्ही वसाहतींमध्ये साधारणत: एक ते दीड हजार कुटूंबिय वास्तव्याला आहेत़ या दोन वसाहतींबरोबरच या परिसरातील इतर वसाहतींसाठी महापालिकेने केवळ एका टँकरचे नियोजन केले आहे़ टँकरचे पॉर्इंटही नेमून दिले आहेत; परंतु, टँकर येण्याची वेळ निश्चित नसल्याने येथील नागरिकांची तारांबळ होते़ यशोधननगर भागात १० दिवसानंतर बुधवारी टँकर दाखल झाले़ त्यामुळे टँकरचे पाणी भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.यशोधननगर परिसरामध्ये जलवाहिनी टाकली आहे; परंतु, या जलवाहिनीला जोडणी दिली नाही़ लोकमान्यनगर भागातील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह टाकल्यानंतर नळाद्वारे यशोधननगराला पाणी उपलब्ध होऊ शकते़ महापालिकेने पुढाकार घेतला तर या भागातील पाण्याची समस्या निकाली निघू शकते़; परंतु, जलवाहिनी टाकूनही अद्याप पाणीपुरवठा सुरू केला नसल्याने येथील नागरिकांना टंचाईचा सामन करावा लागत आहे़ नळ योजना नाही, हातपंपांचे पाणी आटले आहे़ अशा परिस्थितीत या नागरिकांची संपूर्ण भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे; टँकरही बेभरोस्याचे असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत़ नियमित टँकर येत नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा करावा लागतो़ त्यानंतर कुठे टँकरचे पाणी मिळत आहे़ मनपाने या भागात जलवाहिनीचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि येथील समस्या निकाली काढावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ याच परिसरातील रविराज पार्क, पार्वतीनगर या भागाचीही अशीच समस्या आहे़ रविराज पार्क परिसरात जलकुंभ उभारणीचे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे, या भागातही महापालिकेने जलवाहिनी टाकली आहे़ मात्र या जलवाहिनीला पाणी उपलब्ध करून दिले नाही़परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मार्च महिन्यामध्येच रविराज पार्क भागातील हातपंप आटले आहेत़ या भागातही सहा ते सात दिवसांतून एक वेळा टँकरचे पाणी येत असून, सुमारे १ हजार कुटूंबियांसाठी केवळ १२ हजार लिटरचे एकच टँकर पाठविले जाते़ या टँकरच्या दिवसभरातून पाच फेऱ्या होत असल्या तरी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही़ एका वेळेला केवळ ५०० लिटर पाणी मिळते़ हे पाणी जास्तीत जास्त दोन दिवस पुरते़ त्यामुळे मनपाने टँकरची संख्या वाढवावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे़जलकुंभावर जाऊन आणावे लागते टँकर४यशोधननगर, रविराज पार्क या दोन्ही भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ मनपाच्या टँकरचे नियोजन नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जातो़ थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन एक जण टँकरसोबत दिल्यासच ते टँकर वसाहतीपर्यंत पोहचते आणि तेव्हा कुठे नागरिकांना पाणी उपलब्ध होते़ प्रत्येक वेळी अशाच प्रकारे पाठपुरावा केल्यानंतरच टँकर मिळते़ त्यामुळे टंचाईत भर पडली आहे़४महापालिकेचे टँकरचे नियोजन नसल्यानेच परिसरामध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे़ टँकरच्या सहाय्याने किमान तीन दिवसांआड मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला तर नागरिकांची समस्या दूर होऊ शकते़; परंतु, हे नियोजन विस्कळीत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़४टँकरच्या सहाय्याने मिळणारे पाणी सांडपाण्यासाठी वापरले जाते़ पिण्यासाठी मात्र विकतच्या पाण्यावरच येथील नागरिकांची भिस्त आहे़ त्यामुळे टंचाई परिस्थितीमध्ये पाण्यावरील खर्च वाढला आहे़ प्रभागात टँकर पोहचल्यानंतर पाणी वितरित करीत असताना अनेक नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे पाण्यावरून वादाचेही प्रकार घडत आहेत़ मनपाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़मागील महिनाभरात टँकरने केवळ तीन वेळा पाणी मिळाले़ १० दिवसांतून एक वेळा टँकर येत असल्याने पाण्यासाठी ओढाताण होत आहे़ या भागातील बोअर आटल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ मनपाने टँकरची संख्या वाढवावी़-रामचंद्र शिंदे, नागरिकबोअरचे पाणी आटले असून, १५-१५ दिवस टँकरचे पाणी मिळत नाही़ आमच्या भागात नळ नाहीत़ त्यामुळे पाणी संपल्यानंतर दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे़ मागील काही दिवसांपाूसन ही परिस्थिती निर्माण झाली आहे़-शिवनंदा मिरसगावे, नागरिक१५ दिवसांपर्यंत टँकर येत नाही़ नळ योजना नसल्याने पाण्याची खूपच समस्या निर्माण झाली आहे़ या भागात जलकुंभाचे काम सुरू आहे़ ते पूर्ण करून जलवाहिनीच्या माध्यमातून परिसराला त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे़-मीनाबाई चव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई