शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:19 IST

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर १ ते २ क्विंटलवरच समाधान मानावे लागले. पाण्याची सुविधा असणाºया शेतकऱ्यांनाही अपेक्षेप्रमाणे कापसाचे उत्पादन मिळाले नाही.यावर्षी कमी उत्पादन असल्याने कापसाचे भाव तेजीत राहातील, अशी आशा शेतकºयांना लागली होती. मात्र मागील आठवडाभरापासून कापसाचे भाव कमी होत असल्याने शेतकºयांना चिंता लागली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टरवर जास्त कापसाची लागवड झाली होती. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल असे वाटत असतानाच पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमतीमुळे तसेच कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत उत्पादक नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली आहे. सुरुवातील ६ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र त्यानंतरच्या काळात ५७०० ते ५८०० या दरावर भाव स्थिरावले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव वाढतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम होते. ज्या शेतकºयांना ४ ते ५ क्विंटल कापूस झाला आहे. असेच शेतकरी पैशांच्या चणचणीमुळे भाववाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करुन मोकळे झाले आहेत. मात्र ज्या शेतकºयांना जास्तीचे उत्पादन झाले, अशा शेतकºयांनी दरवाढ होईल, या आशेने कापूस घरात ठेवला होता. या शेतकºयांची अशा फोल ठरली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या लिलावात कापसाला वरचा दर ५४९० रुपये मिळाला.मागील आठवडाभरात कापासाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शासकीय सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी बाजार समितीचे सर्व कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य बाजार समिती संघाने आपले आंदोलन मागे घेतल्याने ५ मार्चपासून बाजार समितीत कापासाचा लिलाव सुरु होत असल्याची माहिती बाजार समितीने काढलेल्या परिपत्रकात दिली आहे. शेतकºयांनी आपला कापूस परस्पर न विक्री करता लिलावात विक्री करावा, असे अवाहन सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, प्रभारी सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे.खाजगी व्यापाºयांना प्राधान्यकापूस लिलावात सीसीआयकडून खरेदी करण्यात येत आहे. १५ हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी केला आहे. शासकीय हमीभाव ५४५० प्रती क्विंटल आहे. सीसीआयकडून मिळणाºया हमीभावापेक्षा खाजगी व्यापाºयांकडून मिळणारा भाव जास्त असल्याने व रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूस