शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:19 IST

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर १ ते २ क्विंटलवरच समाधान मानावे लागले. पाण्याची सुविधा असणाºया शेतकऱ्यांनाही अपेक्षेप्रमाणे कापसाचे उत्पादन मिळाले नाही.यावर्षी कमी उत्पादन असल्याने कापसाचे भाव तेजीत राहातील, अशी आशा शेतकºयांना लागली होती. मात्र मागील आठवडाभरापासून कापसाचे भाव कमी होत असल्याने शेतकºयांना चिंता लागली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टरवर जास्त कापसाची लागवड झाली होती. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल असे वाटत असतानाच पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमतीमुळे तसेच कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत उत्पादक नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली आहे. सुरुवातील ६ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र त्यानंतरच्या काळात ५७०० ते ५८०० या दरावर भाव स्थिरावले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव वाढतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम होते. ज्या शेतकºयांना ४ ते ५ क्विंटल कापूस झाला आहे. असेच शेतकरी पैशांच्या चणचणीमुळे भाववाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करुन मोकळे झाले आहेत. मात्र ज्या शेतकºयांना जास्तीचे उत्पादन झाले, अशा शेतकºयांनी दरवाढ होईल, या आशेने कापूस घरात ठेवला होता. या शेतकºयांची अशा फोल ठरली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या लिलावात कापसाला वरचा दर ५४९० रुपये मिळाला.मागील आठवडाभरात कापासाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शासकीय सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी बाजार समितीचे सर्व कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य बाजार समिती संघाने आपले आंदोलन मागे घेतल्याने ५ मार्चपासून बाजार समितीत कापासाचा लिलाव सुरु होत असल्याची माहिती बाजार समितीने काढलेल्या परिपत्रकात दिली आहे. शेतकºयांनी आपला कापूस परस्पर न विक्री करता लिलावात विक्री करावा, असे अवाहन सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, प्रभारी सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे.खाजगी व्यापाºयांना प्राधान्यकापूस लिलावात सीसीआयकडून खरेदी करण्यात येत आहे. १५ हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी केला आहे. शासकीय हमीभाव ५४५० प्रती क्विंटल आहे. सीसीआयकडून मिळणाºया हमीभावापेक्षा खाजगी व्यापाºयांकडून मिळणारा भाव जास्त असल्याने व रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूस