शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड  (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़तालुक्यातील अपूर्ण कामे संथ गतीनेगेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकूल योजनेतील अपूर्ण असलेल्या २७८ घरकुलांच्या कामांपैकी २१५ कामेच सुरू करण्यात आली आहेत़ या घरकुलांच्या कामांवर ८६० मजूर कार्यरत आहेत़ तसेच गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या ५५३ सिंचन विहिरींपैकी १८ विहिरींच्या कामांवर २४८ मजूर तर शोष खड्ड्यांच्या २८ कामांवर ३२० मजूर असे एकूण १४२८ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड, रोपवाटीका या कामांवर ७२ मजूर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्हा रेशीम उद्योग विभागाच्या तुती लागवड व किटक संगोपनाच्या १२ कामांवर ८५ मजूर कार्यरत असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले़ मात्र ही सर्व कामे कागदोपत्री असल्याचाच आरोप जॉबकार्डधारक व ग्रामस्थांमधून केला जात आहे़मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊतालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील मजुरांनी कामांची मागणी केल्यास मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून दिली जातील, त्याचबरोबर मजुरांनी इतरत्र स्थलांतर न करता कामाच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावेत़ गावातील पाणी गावातच मुरून पाणीटंचाईवर करण्यासाठी तसेच डास निर्मूलनासाठी शोष खड्ड्यांचे प्रस्तावही दाखल करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी