शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड  (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़तालुक्यातील अपूर्ण कामे संथ गतीनेगेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकूल योजनेतील अपूर्ण असलेल्या २७८ घरकुलांच्या कामांपैकी २१५ कामेच सुरू करण्यात आली आहेत़ या घरकुलांच्या कामांवर ८६० मजूर कार्यरत आहेत़ तसेच गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या ५५३ सिंचन विहिरींपैकी १८ विहिरींच्या कामांवर २४८ मजूर तर शोष खड्ड्यांच्या २८ कामांवर ३२० मजूर असे एकूण १४२८ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड, रोपवाटीका या कामांवर ७२ मजूर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्हा रेशीम उद्योग विभागाच्या तुती लागवड व किटक संगोपनाच्या १२ कामांवर ८५ मजूर कार्यरत असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले़ मात्र ही सर्व कामे कागदोपत्री असल्याचाच आरोप जॉबकार्डधारक व ग्रामस्थांमधून केला जात आहे़मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊतालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील मजुरांनी कामांची मागणी केल्यास मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून दिली जातील, त्याचबरोबर मजुरांनी इतरत्र स्थलांतर न करता कामाच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावेत़ गावातील पाणी गावातच मुरून पाणीटंचाईवर करण्यासाठी तसेच डास निर्मूलनासाठी शोष खड्ड्यांचे प्रस्तावही दाखल करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी