शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

परभणी : सहा तालुक्यांना दुष्काळी सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:38 IST

दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणोला दिले आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणोला दिले आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यात गंभीर स्वरुपाचा तर परभणी, सेलू व पालम तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आता शासनाने या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता शेतकºयांना जमीन महसूलात सुट देण्यात येणार आहे. तसेच सहकारी कर्जाचे पूनर्गठण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. शेतीशी निगडित सर्व कर्जांच्या वसुलीला शासनाने स्थगिती दिली आहे. कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आली आहे. शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषातही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करु नये, असे आदेश महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहेत. या सवलतींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे महसूल व वन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.‘पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा’४राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण व नागरी क्षेत्रात उपाययोजना करण्याचे आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. जेथे आवश्यक आहे, तेथे टँकर/ बैलगाडीने पाणीपुरवठा करावा, यासाठी शासकीय टँकरचा वापर करावा, आवश्यकता असल्यास खाजगी टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जनतेकडून येणाºया तक्रारींची दखल घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळGovernmentसरकार