शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

परभणी : सहा तालुक्यांना दुष्काळी सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:38 IST

दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणोला दिले आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणोला दिले आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यात गंभीर स्वरुपाचा तर परभणी, सेलू व पालम तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आता शासनाने या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता शेतकºयांना जमीन महसूलात सुट देण्यात येणार आहे. तसेच सहकारी कर्जाचे पूनर्गठण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. शेतीशी निगडित सर्व कर्जांच्या वसुलीला शासनाने स्थगिती दिली आहे. कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आली आहे. शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषातही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करु नये, असे आदेश महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहेत. या सवलतींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे महसूल व वन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.‘पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा’४राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण व नागरी क्षेत्रात उपाययोजना करण्याचे आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. जेथे आवश्यक आहे, तेथे टँकर/ बैलगाडीने पाणीपुरवठा करावा, यासाठी शासकीय टँकरचा वापर करावा, आवश्यकता असल्यास खाजगी टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जनतेकडून येणाºया तक्रारींची दखल घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळGovernmentसरकार