शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

परभणी : १२ गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमूने दुषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:53 IST

जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावागावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअर, हातपंप, सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरींचे पाणी आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासले जाते. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की, नाही? याची तपासणी केली जाते. आरोग्य प्रयोगशाळेने एप्रिल महिन्यात धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९, कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ , महातपुरी आरोग्य केंद्रांतर्गत १४, पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० आणि राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ असे ७० पाण्याचे नमूने तपासले. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ नमुन्यांपैकी खळी तांडा येथील सरकारी योजनेचे २ पाणी नमूने, मातंगवाडा येथील बोअर असे ३ नमूने दुषित आढळले. कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आंतरवेली येथील अमराईची विहीर, बडवणी येथील महादेव मंदिराजवळील आणि जैशोद्दीन पठाण यांचा बोअर आणि आनंदनगर येथील वैजनाथराव मुंडे यांच्या विहिरीच्या पाण्याचे नमूने दुषित आढळले. पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० नमुन्यांपैकी सुप्पा तांडा येथील राठोड यांचा बोअर, देवकतवाडी येथील अंगणवाडीच्या बाजूचा बोअर, धर्मापुरी तांडा येथील राठोड यांचा बोअर, इसाद येथील जिजाऊ चौक व शास्त्रीनगरातील बोअर, बोर्डा समाज मंदिरासमोरील हातपंप, जिल्हा परिषद शाळेसमोरील टाकी, हनुमान नगर तांडा येथील बोअर असे ८ पाण्याचे नमूने दुषित आढळले. राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासलेल्या ९ पाणी नमुन्यांपैकी घटांग्रा येथील २ हातपंप व गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेसमोरील हातपंप असे ३ ठिकाणचे पाणी नमुुने दुषित आढळले. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासलेल्या १४ पाणी नमुन्यांपैकी एकही नमुना दुषित आढळला नाही, असे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ पी.जी. भरणे यांनी ३ मे रोजी गंगाखेड तालुका आरोग्य अधिकारी यु.बी. बिराजदार यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.जलजन्य रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जोखीमग्रस्त गावातील पाणी नमुने तपासून घेण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांचे शुद्धीकरण करणे, नळ गळत्या शोधून काढणे, हातपंपाच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. हा अहवाल प्राप्त होताच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने संबंधित गावांच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.शुद्धीकरणानंतर पाण्याचा वापर४सद्य स्थितीत पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असल्याने तालुक्यातील गावागावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा स्त्रोतातून दुषित पाणी येत असल्याचे समोर आले. याचे प्रमाण केवळ २५.७१ टक्के एवढे असल्याने दुषित पाणी नमुने असलेल्या स्त्रोतांमध्ये ईकोलाय नावाचे ब्लिचिंग पावडर वापरून पाण्याचे शुद्धीकरण करून घ्यावे. त्यानंतरच या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, असे आवाहन डॉ. यु.बी. बिराजदार यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater pollutionजल प्रदूषणdroughtदुष्काळ