शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:25 IST

तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.

अतूल शहाणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुर्णा (परभणी) : तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.पूर्णा तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी रबी पेरणी झाली नाही. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सुटल्याने अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक नाही. परिणामी रबी हंगामातील गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके हातची गेली आहेत. उन्हाळा सुरू होत असताना शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ९५ गावांत ४५ हजार ४०० गाय वर्ग, १५ हजार ९६१ म्हैसवर्ग, २२ हजार ३४७ शेळ्या, ४ हजार ५०८ मेंढ्या तर ४१ घोडे अशी जनावरांची संख्या आहे. पाऊस थांबल्यापासून शेतात असलेल्या हिरव्या चाऱ्यानंतर सोयाबीनच्या गोळीचा वापर चारा म्हणून सुरू झाला. त्यानंतर आता उसाचे वाढे चाºयासाठी पर्याय ठरत आहेत. सद्य स्थितीत ऊस साखर कारखान्यावर पाठविला जात आहे. त्यामुळे वाढे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पावसाळी हायब्रीड ज्वारी व हिवाळी टाळकी ज्वारीचे पीक उपलब्ध नसल्याने उसाच्या वाढ्याला भाव आला आहे. तालुक्यात चारा टंचाई गंभीर होत असून पशूपालकांना चाºयाची चिंता लागली आहे.चाºयासाठी बियाणे वाटप४पंचायत समितींतर्गत येणाºया सात पशुवैद्यकीय केंद्रात मागील पंधरवड्यात चारा उपयोगी बियाणे वाटप करण्यात आले. विविध योजनेंतर्गत मका व संकरित ज्वारीचे ११९० कि.ग्रॅम बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे, असे असले तरी पाणी उपलब्ध नसल्याने हे बियाणे उगवतील की, नाही, या विषयी शंका निर्माण होत आहे.पशुधनाची बाजारात विक्री४चाºयाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बहुतांश शेतकºयांनी आपले पशुधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे जनावरे कशी जोपासावीत, असा भावनिक सवाल शेतकरी करीत आहेत.परिणामी जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी येत आहेत.‘चारा छावण्या सुरू करा’तालुक्यात चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने या संदर्भात प्राधान्याने विचार करून आगामी काही दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी