शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:25 IST

तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.

अतूल शहाणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुर्णा (परभणी) : तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.पूर्णा तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी रबी पेरणी झाली नाही. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सुटल्याने अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक नाही. परिणामी रबी हंगामातील गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके हातची गेली आहेत. उन्हाळा सुरू होत असताना शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ९५ गावांत ४५ हजार ४०० गाय वर्ग, १५ हजार ९६१ म्हैसवर्ग, २२ हजार ३४७ शेळ्या, ४ हजार ५०८ मेंढ्या तर ४१ घोडे अशी जनावरांची संख्या आहे. पाऊस थांबल्यापासून शेतात असलेल्या हिरव्या चाऱ्यानंतर सोयाबीनच्या गोळीचा वापर चारा म्हणून सुरू झाला. त्यानंतर आता उसाचे वाढे चाºयासाठी पर्याय ठरत आहेत. सद्य स्थितीत ऊस साखर कारखान्यावर पाठविला जात आहे. त्यामुळे वाढे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पावसाळी हायब्रीड ज्वारी व हिवाळी टाळकी ज्वारीचे पीक उपलब्ध नसल्याने उसाच्या वाढ्याला भाव आला आहे. तालुक्यात चारा टंचाई गंभीर होत असून पशूपालकांना चाºयाची चिंता लागली आहे.चाºयासाठी बियाणे वाटप४पंचायत समितींतर्गत येणाºया सात पशुवैद्यकीय केंद्रात मागील पंधरवड्यात चारा उपयोगी बियाणे वाटप करण्यात आले. विविध योजनेंतर्गत मका व संकरित ज्वारीचे ११९० कि.ग्रॅम बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे, असे असले तरी पाणी उपलब्ध नसल्याने हे बियाणे उगवतील की, नाही, या विषयी शंका निर्माण होत आहे.पशुधनाची बाजारात विक्री४चाºयाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बहुतांश शेतकºयांनी आपले पशुधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे जनावरे कशी जोपासावीत, असा भावनिक सवाल शेतकरी करीत आहेत.परिणामी जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी येत आहेत.‘चारा छावण्या सुरू करा’तालुक्यात चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने या संदर्भात प्राधान्याने विचार करून आगामी काही दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी