शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

परभणी : जिल्ह्याची नजर आणेवारी ५४ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:59 IST

खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. यापूर्वी या आणेवारीवरुनच दुष्काळाचेही मूल्यमापन केले जात होते. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिंतूर तालुक्याची सर्वात कमी ५२ पैसे आणि पाथरी तालुक्यातील ५२.८५ पैसे आणेवारी निघाली आहे. इतर तालुक्यांची नजर आणेवारीही ५२ ते ५७ पैशांच्या आसपास आहे.जिल्ह्यातील प्राथमिक नजर आणेवारी ५४.२४ पैसे निघाल्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या मदतीवरही पाणी फेरले गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन, कापूस, तूर, मुग ही महत्त्वाची पिके घेतली गेली. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय सोयाबिन पिकावही रोगाचा प्रादुर्भाव आहे. तब्बल दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाली आहे.सुधारित आणि अंतिम आणेवारीत या पैसेवारी किती फरक पडतो, यावरच शासकीय मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे.सर्व गावे ५० पैश्यांपेक्षा अधिकमहसूल प्रशासनाने काढलेल्या नजर आणेवारीत एकाही गावात ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी निघालेली नाही. सर्वच्या सर्व गावांमध्ये ५० पैश्यांपेक्षा अधिक पैसेवारी निघाल्याने आता सुधारित आणेवारीत काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या गावा-गावात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगानंतरच सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग