शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परभणी : जिल्ह्याची नजर आणेवारी ५४ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:59 IST

खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. यापूर्वी या आणेवारीवरुनच दुष्काळाचेही मूल्यमापन केले जात होते. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिंतूर तालुक्याची सर्वात कमी ५२ पैसे आणि पाथरी तालुक्यातील ५२.८५ पैसे आणेवारी निघाली आहे. इतर तालुक्यांची नजर आणेवारीही ५२ ते ५७ पैशांच्या आसपास आहे.जिल्ह्यातील प्राथमिक नजर आणेवारी ५४.२४ पैसे निघाल्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या मदतीवरही पाणी फेरले गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन, कापूस, तूर, मुग ही महत्त्वाची पिके घेतली गेली. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय सोयाबिन पिकावही रोगाचा प्रादुर्भाव आहे. तब्बल दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाली आहे.सुधारित आणि अंतिम आणेवारीत या पैसेवारी किती फरक पडतो, यावरच शासकीय मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे.सर्व गावे ५० पैश्यांपेक्षा अधिकमहसूल प्रशासनाने काढलेल्या नजर आणेवारीत एकाही गावात ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी निघालेली नाही. सर्वच्या सर्व गावांमध्ये ५० पैश्यांपेक्षा अधिक पैसेवारी निघाल्याने आता सुधारित आणेवारीत काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या गावा-गावात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगानंतरच सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग