शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

परभणी : जिल्ह्याची नजर आणेवारी ५४ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:59 IST

खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. यापूर्वी या आणेवारीवरुनच दुष्काळाचेही मूल्यमापन केले जात होते. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिंतूर तालुक्याची सर्वात कमी ५२ पैसे आणि पाथरी तालुक्यातील ५२.८५ पैसे आणेवारी निघाली आहे. इतर तालुक्यांची नजर आणेवारीही ५२ ते ५७ पैशांच्या आसपास आहे.जिल्ह्यातील प्राथमिक नजर आणेवारी ५४.२४ पैसे निघाल्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या मदतीवरही पाणी फेरले गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन, कापूस, तूर, मुग ही महत्त्वाची पिके घेतली गेली. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय सोयाबिन पिकावही रोगाचा प्रादुर्भाव आहे. तब्बल दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाली आहे.सुधारित आणि अंतिम आणेवारीत या पैसेवारी किती फरक पडतो, यावरच शासकीय मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे.सर्व गावे ५० पैश्यांपेक्षा अधिकमहसूल प्रशासनाने काढलेल्या नजर आणेवारीत एकाही गावात ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी निघालेली नाही. सर्वच्या सर्व गावांमध्ये ५० पैश्यांपेक्षा अधिक पैसेवारी निघाल्याने आता सुधारित आणेवारीत काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या गावा-गावात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगानंतरच सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग