शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा : शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:38 IST

शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.शिवसेनेच्या परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शुक्रवारी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचे नियोजन गेल्या आठ दिवसांपासून सुरु होते. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, परभणी विधानसभा निरीक्षक जगदीश चौधरी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, माणिक पोंढे, नंदकुमार आवचार, संदीप झाडे, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, चंदू शिंदे, अंबिका डहाळे, दीपक देशमुख, विश्वास कºहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, संभानाथ काळे, अजय पेदापल्ली, मारोती तिथे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड आदी सहभागी झाले होते. मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशनरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध असताना १२ तासही वीज पुरवठा उपलब्ध करुन दिला जात नाही. थकबाकीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते लवकर दुरुस्त करुन दिले जात नाही. त्यामुळे पाणी असूनही त्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. सरकारच्या या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. कर्जमाफीच्या नावाखाली शासनाने शेतकºयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांनी अच्छे दिन हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आले आहेत. हे केवळ घोषणाबाजी करणारे आॅनलाईन सरकार आहे. या सरकारने शेतकºयांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाही तर शिवसैनिक त्यांना कधीही आॅफलाईन करु शकतात, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी होती, आहे आणि यापुढेही कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता शेवटपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नावर संघर्ष करीत त्यांच्या सोबत राहणार, असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, नोटाबंदीच्या नावाखाली केंद्र शासनाने सर्व सामान्यांची लूट केली आहे. उद्योगपती व काळा धंदा करणाºयांचा पैसा या माध्यमातून पांढरा करण्यात आला असून सर्वसामान्यांना देशोधडीस लावण्यात आले आहे.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हा केवळ चुनावी जुमला होता. ६० वर्षात काँग्रेसवाल्यांनी जेवढे लुटले नाही, तेवढे तीन वर्षात या भाजपावाल्यांनी लुटले, असे ते म्हणाले. शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यात येईल, असे एकीकडे पंतप्रधान सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे, मग उत्पन्न कुठून दुप्पट होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी निरीक्षक चौधरी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. नावंदर, जिल्हाप्रमुख आणेराव आदींची भाषणे झाली. या सभेचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चातील बैलगाड्यांनी वेधले लक्षशनिवारबाजारपासून निघालेल्या मोर्चात ग्रामीण भागातून बैलगाडीसह आलेले शेतकरी समोरील बाजूस होते. या बैलगाड्यांमध्ये बोंडअळीने नुकसान झालेल्या कापसाची झाडे शेतकºयांनी आाणली होती. रस्त्यावरुन मोर्चा जसा जसा पुढे जात होता, तशा तशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकरी करीत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बैलगाडीतील कापसाची पिके भाषणाच्या वेळी व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. या पिकांकडे पाहून उपस्थित वक्ते बोंडअळीच्या नुकसानीची तीव्रता आपल्या भाषणातून मांडत होते.