शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा : शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:38 IST

शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामधील घोषणांनी परिसर दणाणून गेला.शिवसेनेच्या परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शुक्रवारी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचे नियोजन गेल्या आठ दिवसांपासून सुरु होते. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, परभणी विधानसभा निरीक्षक जगदीश चौधरी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, माणिक पोंढे, नंदकुमार आवचार, संदीप झाडे, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, चंदू शिंदे, अंबिका डहाळे, दीपक देशमुख, विश्वास कºहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, संभानाथ काळे, अजय पेदापल्ली, मारोती तिथे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड आदी सहभागी झाले होते. मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशनरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध असताना १२ तासही वीज पुरवठा उपलब्ध करुन दिला जात नाही. थकबाकीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते लवकर दुरुस्त करुन दिले जात नाही. त्यामुळे पाणी असूनही त्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. सरकारच्या या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. कर्जमाफीच्या नावाखाली शासनाने शेतकºयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांनी अच्छे दिन हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आले आहेत. हे केवळ घोषणाबाजी करणारे आॅनलाईन सरकार आहे. या सरकारने शेतकºयांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाही तर शिवसैनिक त्यांना कधीही आॅफलाईन करु शकतात, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी होती, आहे आणि यापुढेही कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता शेवटपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नावर संघर्ष करीत त्यांच्या सोबत राहणार, असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, नोटाबंदीच्या नावाखाली केंद्र शासनाने सर्व सामान्यांची लूट केली आहे. उद्योगपती व काळा धंदा करणाºयांचा पैसा या माध्यमातून पांढरा करण्यात आला असून सर्वसामान्यांना देशोधडीस लावण्यात आले आहे.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हा केवळ चुनावी जुमला होता. ६० वर्षात काँग्रेसवाल्यांनी जेवढे लुटले नाही, तेवढे तीन वर्षात या भाजपावाल्यांनी लुटले, असे ते म्हणाले. शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यात येईल, असे एकीकडे पंतप्रधान सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे, मग उत्पन्न कुठून दुप्पट होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी निरीक्षक चौधरी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. नावंदर, जिल्हाप्रमुख आणेराव आदींची भाषणे झाली. या सभेचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चातील बैलगाड्यांनी वेधले लक्षशनिवारबाजारपासून निघालेल्या मोर्चात ग्रामीण भागातून बैलगाडीसह आलेले शेतकरी समोरील बाजूस होते. या बैलगाड्यांमध्ये बोंडअळीने नुकसान झालेल्या कापसाची झाडे शेतकºयांनी आाणली होती. रस्त्यावरुन मोर्चा जसा जसा पुढे जात होता, तशा तशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकरी करीत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बैलगाडीतील कापसाची पिके भाषणाच्या वेळी व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. या पिकांकडे पाहून उपस्थित वक्ते बोंडअळीच्या नुकसानीची तीव्रता आपल्या भाषणातून मांडत होते.