शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

परभणी : जिंतूर तालुक्यात ‘मुन्नाभार्इं’चा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:51 IST

वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा हा वैद्यकीय व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागानेही मागील वर्षी ५४ डॉक्टरांवर कार्यवाही केली होती. संबंधित डॉक्टरवर जिंतूर, बोरी व बामणी पोलीस स्थानकाला गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही महिने हे बोगस डॉक्टर एक तर भूमिगत झाले किंवा दवाखाना बंद करुन इतरत्र गेले होते; परंतु, मागील ६ महिन्यांपासून तालुक्यातील अनेक ठिकाणी हे बोगस डॉक्टर उघडपणे दवाखाने चालवित आहेत.शहरातील नामवंत वैद्यकीय डॉक्टरांकडे काही दिवस कपाऊंडर म्हणून काम केल्यानंतर हे कपाऊंडर सहजतेने ग्रामीण भागात जावून डॉक्टर असल्याचे भासवून सलाईन, इंजेक्शन व अ‍ॅलोपॅथिक औषधी देतात. ग्रामीण भागातील अशिक्षित व गोरगरीब जनतेला फसवून हजारो रुपये उकळतात. विशेष म्हणजे, पांढऱ्या पेशा कमी होण्यापासून ते दुर्धर आजारावरही ही मंडळी सहजतेने उपचार करतात. तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या १०० पेक्षा जास्त असून आरोग्य खात्याचे दुर्लक्ष व अर्थपूर्ण संबंध हे यास कारणीभूत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाही बोगस डॉक्टरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येते. यामुळे हा व्यवसाय तालुक्यात बिनबोभाटपणे सुरु आहे.पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह४मागील वर्षी तालुक्यातील ५४ बोगस डॉक्टरांवर जिंतूर, बामणी व बोरी, चारठाणा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सोयीनुसार केला. घटनास्थळ पंचनामा, साहित्य व पुराव्याचे सखोल विश्लेषण कोर्टात दाखल करण्याऐवजी अनेक प्रकरणात पुरावे नसल्याचे कारण देऊन गुन्हा निकाली काढण्याबाबत अहवाल न्यायालयात दाखल केले. यामुळे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.बोगस डॉक्टरांना आडमार्गाचा वापरआरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसल्याने आपल्यावर कार्यवाही होते, हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेद, फिजिओथेरपी व इतर मार्गाचा अवलंब करुन प्रमाणपत्रे मिळविली असून, सहजपणे हा व्यवसाय करीत आहेत. मात्र रुग्णांना अ‍ॅलोपॅथीची औषधी दिली जाते. यामुळे रुग्णांच्या जिविताशी हा खेळ सुरु आहे.आरोग्य विभागाने फिर्याद देताना व साक्षीदार देताना काळजी घेतली नाही. फिर्यादीने आरोपींना तांत्रिकदृष्ट्या गुन्हा टिकू नये, अशी फिर्याद दिल्याने व पोलीस प्रशासनाने तपासात गोलमाल पुरावे गोळा केल्यानेच न्यायालयात गुन्हे टिकले नाहीत. शिवाय आरोपींनीही फिल्डींग लावल्याने पोलिसांनी न्यायालयात ‘क’ फायनल अहवाल दिल्यानेच कारवाई पुढे चालू शकली नाही.- मनोज सारडा, विधिज्ञ, जिंतूर५४ बोगस डॉक्टरांवर कार्यवाही केली. मात्र पोलिसांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आपला कोणताही जबाब घेतला नाही. परिणामी अनेकांचे गुन्हे जागेवरच बंद करण्यात आले. आरोग्य खात्याने कार्यवाही केली. पण पोलिसांनी प्रकरण बंद केले.-दिनेश बोराळकर, तालुका आरोग्य अधिकारी, जिंतूरबोगस डॉक्टरांनी व्यवसाय करणे हे चुकीचे असून आरोग्य खात्याने यासाठी पुढाकार घ्यावा. संघटना म्हणून पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला तर कार्यवाहीबाबत आग्रह धरता येईल; परंतु, सर्वांचेच हितसंबंध असल्याने कार्यवाहीसाठी पुढाकार घेतला जात नाही.-शिवप्रसाद सानप, डॉक्टर असो.

टॅग्स :parabhaniपरभणीdoctorडॉक्टर