शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

परभणी जिल्हा रुग्णालय : वर्षभरात विषबाधेच्या ६२० रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:41 IST

किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारावर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून रुग्णांचे प्रमाण अधिक आहे़ अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, जळित विभाग आदी विभागांमधून रुग्णांवर उपचार केले जातात़ त्याचबरोबर विषबाधीत रुग्णांवरही रुग्णालयात अद्यायवत सुविधांचा वापर करून उपचार केले जातात़ मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून होतात़ शेतकरी आत्महत्यांबरोबरच घरगुती कलहातून विष घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत़ तर अनेक वेळा नजरचुकीने पोटात विष जाऊन विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ या सर्व प्रकरणांमध्ये उपचाराची जबाबदारी जिल्हा रुग्णालयावर येऊन ठेपते़ ग्रामीण भागातून दाखल झालेल्या या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना जीवदान देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात़एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या एक वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ६६३ रुग्ण विषबाधेवर उपचार करण्यासाठी दाखल झाले होते़ या रुग्णांना तातडीने उपचार मिळाले़ त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत़एका वर्षात दाखल झालेल्या ६६३ रुग्णांपैकी केवळ ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळाल्याने ते पूर्ववत आपले जीवन जगत आहेत़जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषबाधेच्या प्रकरणात मिळालेली आकडेवारी पाहता कीटक नाशकांमधून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. आहे़ ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारणपणे शेतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते़ ही कामे करीत असताना पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो़ हे कीटकनाशक फवारण्याचे जोखमीचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ यातून अनेक वेळा कीटकनाशक पोटात जाऊन विषबाधा होण्याचे प्रकार होतात़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षभरामध्ये कीटकनाशक पोटात गेल्याने ४१६ जणांना विषबाधा झाली होती़ २४७ रुग्ण हे कीटकनाशकाव्यतिरिक्त विष पोटात गेल्याने दाखल झाले होते़ ही आकडेवारी लक्षात घेता कीटकनाशकांचा वापर हानिकारकच असल्याचे समोर येत आहे़एका महिन्यात ८५ रुग्ण दाखलजिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये अपघाताबरोबर इतर आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी विषबाधा झाल्याचे प्रमाणही नजरेत भरण्याएवढे आहे़ मागील महिन्यात सामान्य रुग्णालयामध्ये ८५ रुग्णांवर विषबाधेचे उपचार करण्यात आले़ रॉकेल, वेगवेगळ्या प्रकारची विषारी औषधी, उंदिर मारण्याचे औषध, झुरळ, डास, मुंगी असे कीटक मारण्याच्या रसायनांंमधून विषबाधा झाल्याचे उपचारा दरम्यान निष्पन्न झाले आहे़ एका महिन्याचा विचार करता ८५ पैकी केवळ ५ रुग्णांवर मृत्यू ओढावला तर उर्वरित ८० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ योग्य वेळी योग्य उपचार झाल्याने या रुग्णांना जीवदान मिळाले आहे.विषबाधेच्या घटनांत वाढमागील काही वर्षांपासून जिल्हाभरात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे़ त्याचबरोबर कौटुंबिक कलहातूनही आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले जाते़ अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतात़ विष पोटात गेल्याने विषबाधा असो की विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे असो़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र या रुग्णांवर उपचार केले जातात़ सामान्य रुग्णालयात विषबाधेने दाखल झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता विषबाधेचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे़ रुग्णालयातून जीवदान मिळणाºया रुग्णांची संख्याही अधिक असल्याने सामान्य रुग्णालयातच उपचार घेणाºयांची संख्या वाढत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीPoliceपोलिस