शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

परभणी जिल्हा रुग्णालय : वर्षभरात विषबाधेच्या ६२० रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:41 IST

किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारावर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून रुग्णांचे प्रमाण अधिक आहे़ अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, जळित विभाग आदी विभागांमधून रुग्णांवर उपचार केले जातात़ त्याचबरोबर विषबाधीत रुग्णांवरही रुग्णालयात अद्यायवत सुविधांचा वापर करून उपचार केले जातात़ मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून होतात़ शेतकरी आत्महत्यांबरोबरच घरगुती कलहातून विष घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत़ तर अनेक वेळा नजरचुकीने पोटात विष जाऊन विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ या सर्व प्रकरणांमध्ये उपचाराची जबाबदारी जिल्हा रुग्णालयावर येऊन ठेपते़ ग्रामीण भागातून दाखल झालेल्या या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना जीवदान देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात़एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या एक वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ६६३ रुग्ण विषबाधेवर उपचार करण्यासाठी दाखल झाले होते़ या रुग्णांना तातडीने उपचार मिळाले़ त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत़एका वर्षात दाखल झालेल्या ६६३ रुग्णांपैकी केवळ ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळाल्याने ते पूर्ववत आपले जीवन जगत आहेत़जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषबाधेच्या प्रकरणात मिळालेली आकडेवारी पाहता कीटक नाशकांमधून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. आहे़ ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारणपणे शेतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते़ ही कामे करीत असताना पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो़ हे कीटकनाशक फवारण्याचे जोखमीचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ यातून अनेक वेळा कीटकनाशक पोटात जाऊन विषबाधा होण्याचे प्रकार होतात़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षभरामध्ये कीटकनाशक पोटात गेल्याने ४१६ जणांना विषबाधा झाली होती़ २४७ रुग्ण हे कीटकनाशकाव्यतिरिक्त विष पोटात गेल्याने दाखल झाले होते़ ही आकडेवारी लक्षात घेता कीटकनाशकांचा वापर हानिकारकच असल्याचे समोर येत आहे़एका महिन्यात ८५ रुग्ण दाखलजिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये अपघाताबरोबर इतर आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी विषबाधा झाल्याचे प्रमाणही नजरेत भरण्याएवढे आहे़ मागील महिन्यात सामान्य रुग्णालयामध्ये ८५ रुग्णांवर विषबाधेचे उपचार करण्यात आले़ रॉकेल, वेगवेगळ्या प्रकारची विषारी औषधी, उंदिर मारण्याचे औषध, झुरळ, डास, मुंगी असे कीटक मारण्याच्या रसायनांंमधून विषबाधा झाल्याचे उपचारा दरम्यान निष्पन्न झाले आहे़ एका महिन्याचा विचार करता ८५ पैकी केवळ ५ रुग्णांवर मृत्यू ओढावला तर उर्वरित ८० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ योग्य वेळी योग्य उपचार झाल्याने या रुग्णांना जीवदान मिळाले आहे.विषबाधेच्या घटनांत वाढमागील काही वर्षांपासून जिल्हाभरात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे़ त्याचबरोबर कौटुंबिक कलहातूनही आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले जाते़ अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतात़ विष पोटात गेल्याने विषबाधा असो की विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे असो़ जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र या रुग्णांवर उपचार केले जातात़ सामान्य रुग्णालयात विषबाधेने दाखल झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता विषबाधेचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे़ रुग्णालयातून जीवदान मिळणाºया रुग्णांची संख्याही अधिक असल्याने सामान्य रुग्णालयातच उपचार घेणाºयांची संख्या वाढत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीPoliceपोलिस