शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी  जिल्ह्यात १ लाख मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:05 IST

भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्ष आणि पदाधिकाºयांच्या कामातही यानिमित्ताने वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्ष आणि पदाधिकाºयांच्या कामातही यानिमित्ताने वाढ झाली आहे़एप्रिल २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीच्या कालावधीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले कसब पणाला लावून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी १२ लाख ६९ हजार १४६ मतदारांमधून जिल्ह्याचा उमेदवार निवडण्यात आला़ आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे़ साधारणत: मार्च महिन्यात या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार असून, त्यापूर्वीच भारत निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे़ निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला़ १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली़ १ जानेवारी २०१८ हा अर्हता दिनांक निश्चित करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली़ महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीचे कार्यक्रम पार पडले़ तसेच दुबार नावे, नावातील दुरुस्त्याही करण्यात आल्या़ ३१ जानेवारी रोजी या उपक्रमाची अंतीम मतदार यादी जाहीर होणार असून, या मतदार यादीवरच आगामी लोकसभेचे मतदान घेतले जाणार आहे़सरासरी २५ हजार मतदार वाढलेपरभणी लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघ आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे़ जिल्ह्याचा विचार करता प्रत्येक विधानसभा मतदार संघात सरासरी २५ हजार मतदारांची वाढ झाली आहे़ जिंतूर मतदार संघात मागील वर्षीच्या लोकसभेसाठी ३ लाख १६ हजार ९३५ मतदार होते़ यावर्षी ३ लाख ४५ हजार ३४२ मतदार संख्या झाली आहे़ या मतदार संघामध्ये २८ हजार ४०७ नवीन मतदारांची भर पडली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघात २७ हजार १११ नवीन मतदारांची भर पडली असून, या मतदार संघाची मतदार संख्या २ लाख ९९ हजार २५३ एवढी झाली आहे़ गंगाखेड मतदार संघात २८ हजार ७४ नवीन मतदारांची नोंद झाली असून, पाथरी विधानसभा मतदार संघामध्ये २३ हजार ४१३ मतदार वाढले आहेत.८ टक्के महिला मतदार कमीपरभणी जिल्ह्याच्या लोकसंख्येतही पुरुष आणि महिलांचे प्रमाण असमतोल आहे़ जिल्ह्यामध्ये १० लाख २९ हजार ३४७ पुरुष असून, ९ लाख ७५ हजार २२६ महिला आहेत़ मतदार यादीतही पुरुष आणि महिलांचे प्रमाण असमतोल असल्याचे दिसत आहे़ जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये ७ लाख १५ हजार २४९ पुरुष मतदार असून, ६ लाख ६० हजार ८९१ महिला मतदारांची संख्या आहे़ पुरुषांच्या तुलनेत ८ टक्के महिला मतदार कमी आहेत़तृतीयपंथी मतदारांतही वाढयेथील निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये नव मतदार, महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली़ त्याचबरोबर जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदारांचीही वाढ झाली आहे, हे विशेष़ १ जानेवारी २०१८ रोजी मतदार यादीत ७ तृतीयपंथी मतदारांची नोंद होती़ पुनरिक्षण कार्यक्रमानंतर तृतीयपंथी मतदारांची संख्या ११ झाली असून, ४ मतदारांची वाढ झाली आहे़२१ जानेवारीपर्यंत जिल्हा निवडणूक विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या १३ लाख ७६ हजार १५१ एवढी झाली आहे़ मागील निवडणुकीमध्ये १२ लाख ६९ हजार १४६ मतदार होते़ मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली आहे़ त्यामुळे निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठीही स्पर्धा वाढली आहे़ या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ३१ जानेवारी रोजीच अंतीम मतदारांची संख्या निश्चित होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक