शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:51 IST

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत द्यावी, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करावी, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला. जोशी समाज, गोसावी समाज, डवरी गोसावी समाज, सिकलकरी समाज, वैंदू समाज, बहुरुपी, गारुडी समाज, कैकाडी समाज, जोगी समाज आदी भटक्या समाजातील महिला, पुरुष पारंपारिक वेषभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. भटक्या विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे, राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, विसावा कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनस्थळी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण, भगवान भोळे, ज्ञानेश्वर भोसले, बाबासाहेब भोसले, गोविंद सरवदे, रामेश्वर भोळे, पंडित भोसले, दिलीप हरगावकर, मदन नरवाडे, अशोक नरवाडे, रेड्डीसिंग बावरी, आनंद वंजारी, सटवाजी भोळे, साधनाताई राठोड आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राईनपाडा सारख्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी समाजाने काळजी घ्यावी, शिक्षणाची कास धरावी, संघटीत होऊन आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सत्ता ताब्यात घ्या : आंबेडकरभारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन झाले नाही. राज्यकर्त्यांना भटक्या समाजाविषयी आस्था नसल्यानेच हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता न्याय मिळण्याचीही अपेक्षा नाही.समाजाला विकासाच्या मार्गावर आणयचे असेल तर सत्ता मिळविणे हा एकच पर्याय आहे. त्यामुळे मताचा योग्य वापर करुन सत्ता काबीज करा. त्यासाठी संघटित व्हा, सत्ता ताब्यात असेल तरच आपले प्रश्न सुटतील, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणराव माने यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीMorchaमोर्चा