शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : दीड लाख शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ३१ आॅगस्टपर्यंत ८०० कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांकडून मिळाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ३१ आॅगस्टपर्यंत ८०० कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांकडून मिळाली़जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत अपुरा पाऊस झाला़ परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ त्यामुळे रबी व खरीप हंगामात जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली़ तसेच २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षांत जिल्ह्यात काही भागात अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले़ या चार वर्षांत शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला़२०१५-१६ या खरीप हंगामात शेतकºयांना बियाणे खरेदीसाठी पैसे उपलब्ध नव्हते़ त्यामुळे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर शेतकºयांची भिस्त होती़ संकटात सापडलेल्या शेतकºयांना बँकांनीही मदतीचा हात दिला़ गतवर्षी तर जिल्ह्यात १६३४ कोटींचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज वाटप करण्यात आले़ त्यामुळे पेरणीसाठी शेतकºयांकडे पैसा उपलब्ध झाला़२०१६ च्या खरीप हंगामात शेतकºयांना चांगले उत्पादन झाले़; परंतु, मालाची आवक वाढल्याने व्यापाºयांनी हा माल कवडीमोल दराने खरेदी केला़ त्यामुळे उत्पन्न होवूनही बँकांकडून घेतलेले पीक कर्ज शेतकरी फेडू शकले नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले़बँकांकडून कर्ज पुरवठा देण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना टाळाटाळ होत होती़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला़त्यामुळे राज्य शासनाने २८ जून २०१७ रोजी एका शासन आदेशानुसार शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंमलात आणली़ या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दीड लाख रुपयापर्यंत शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली़ त्यानुसार ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ८०० कोटी ७७ लाख ३४ हजार ३४९ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे़जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी मात्र अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत़कर्जमाफीची शेतकºयांना मिळेना माहितीराज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ८०० कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी ३१ आॅगस्टपर्यंत दिली आहे; परंतु, या कर्जमाफीची बहुतांश शेतकºयांना अद्यापही माहिती मिळालेली नाही़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने केवळ कागदोपत्री आकडे दाखवून कर्जमाफी झाल्याचे सांगितले जात आहे़मात्र ज्या शेतकºयांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्यांना माहिती मिळत नाही़ त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे़ एखादा शेतकरी बँकेकडे नवीन पीककर्ज मागणीसाठी गेला तर त्याला कर्जमाफी झाली नसल्याचे सांगण्यात येते व ज्या शेतकºयांना कर्जमाफी झाली आहे, त्या शेतकºयांना काही तरी पैसे भरण्याची मागणी होत आहे़त्यामुळे या कर्जमाफीबद्दल जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे़ यामुळे जिल्हा प्रशासन, त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालय व बँक प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात किती शेतकºयांना कर्जमाफी झाली? त्यांची नावे? ती किती झाली? व किती बाकी आहे? याची माहिती कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे़अशी प्राप्त झाली : कर्जमाफीची रक्कमछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योनजेंतर्गत अलहाबाद बँकेतील २ हजार २२१ शेतकºयांचे कर्जमाफीचे १५ कोटी ५० लाख ४५ हजार २६२ रुपये बँकेला प्राप्त झाले आहेत़ आंध्रा बँकेतील १ हजार २८१ शेतकºयांना ५ कोटी ९८ लाख २३ हजार ३४ रुपये, बँक आॅफ बडोदातील १ हजार ६७१ शेतकºयांसाठी ११ कोटी ८४ लाख ५८ हजार ८८९ रुपये, बँक आॅफ इंडियामधील १७०० खातेदार शेतकºयांसाठी ११ कोटी ६० लाख ७४ हजार ४३६, बँक आॅफ महाराष्ट्रतील ८ हजार ९५५ शेतकºयांसाठी ४९ कोटी ८० लाख ५० हजार ८४८ रुपये, कॅनरा बँकेतील ९४२ शेतकºयांसाठी ८ कोटी ३४ लाख ४८१ रुपये, सेंट्रल बँक आॅफ इंडियातील ६२२ शेतकºयांसाठी ३ कोटी ८० लाख ६ हजार १७९, देना बँकेतील १३७५ शेतकºयांसाठी ९ कोटी ३४ लाख ५८ हजार १४२, आयडीबीआय बँकेतील ३०६ ग्राहकांसाठी १४ कोटी ३२ लाख ५ हजार ७०८ रुपये, इंडियन ओव्हरसीस बँकेतील ३३८ शेतकºयांसाठी १ कोटी ९९ लाख ९९ हजार २३६ रुपये, पंजाब नॅशनल बँकेतील १५१ शेतकºयांसाठी ८४ लाख ४ हजार ८५७ रुपये, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेतील ७३ हजार ४२६ शेतकºयांसाठी ५१५ कोटी ६७ लाख ५५ हजार ७०७ रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १८ हजार ७४६ शेतकºयांसाठी १११ कोटी २३ लाख ९६ हजार ९५७ रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २७ हजार २३२ शेतकºयांसाठी ३९ कोटी ७८ हजार ४५० रुपयांची कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी