शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:36 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये खंड घेत पाऊस झाला. हा पाऊस प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मात्र झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना तारले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. मान्सूनचा पाऊस साधारणत: एक महिना उशिराने जिल्ह्यात दाखल झाला आणि एक महिना उशिरानेच परतीला निघाला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात यावर्षी पाऊस होत आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी ७७४ मि.मी.पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत ६६२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला असून अजून १५ टक्के पावसाची तूट आहे.दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस होत आहे. शनिवारी सेलू आणि पाथरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यानंतर रविवारीही हा पाऊस जिल्ह्यात बरसला. पालम तालुक्यात सर्वाधिक ४८ मि.मी. पाऊस झाला आहे. तर परभणी १०.७६, पूर्णा ३५.२०, गंगाखेड २६.५०, सोनपेठ ३४, सेलू ४.८०, पाथरी १३.३३, जिंतूर ०.५० आणि मानवत तालुक्यात ७.६७ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी २०.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.परभणी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस या तालुक्यात नोंद झाला आहे. तर जिंतूर तालुक्यातही केवळ ६५ टक्के पाऊस आतापर्यंत बरसला. पालम तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात आतापर्यत ७३२.३५ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या १०५ टक्के पाऊस अधिक नोंद झाला आहे.या शिवाय पाथरी तालुक्याची वार्षिक सरासरी ७६८.५० मि.मी. असून या तालुक्यात ७७९ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्याची सरासरी ८०४ मि.मी. असून या तालुक्यात ७९६ मि.मी. (९० टक्के), गंगाखेड तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात ६४४.५० मि.मी. (९२ टक्के), सोनपेठ तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून तालुक्यात ५७९ मि.मी. (८३ टक्के), सेलू तालुक्यात ६५४ मि.मी. (८०.२ टक्के), मानवत तालुक्यात ८१६ मि.मी.पैकी ७०५ मि.मी. म्हणजे ८६.४ मि.मी. पाऊस झाला आहे.खडकपूर्णा प्रकल्पातून १० क्युसेस पाण्याचा विसर्ग४पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून २१ आॅक्टोबर रोजी पहाटे ३.३५ वाजता ७ दरवाजांमधून १० हजार ४०७ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आवश्यकता भासल्यास हा विसर्ग वाढविला जाईल, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली. त्यामुळे पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या येलदरी प्रकल्पामध्ये १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पामध्ये येणार आहे.४सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प दोन वर्षांपासून मृतसाठ्यात आहे. या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला मृतसाठ्यात ६२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पावर सेलू तालुक्यासह इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. शनिवारी या तालुक्यात विक्रमी ११७ मि.मी. पाऊस झाला होता. या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारीही तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस