शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

परभणी जिल्हा : ७९ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:44 IST

जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका यावर्षी सहन करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांना शेतशिवारांमधून पाणी आणावे लागत आहे. पालम, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू या तालुक्यांमध्ये पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरु केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करुन हे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करुन दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गंगाखेड तालुक्यामध्ये विहीर अधिग्रहणासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. पालम तालुक्यामध्ये १७, पूर्णा १६, जिंतूर ११, सेलू १, पाथरी २ आणि मानवत तालुक्यात एका गावात विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी आणि सोनपेठ या दोन तालुक्यातून एकही प्रस्ताव अधिग्रहणासाठी दाखल झाला नाही, हे विशेष. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत चालली असून विहीर अधिग्रहणाबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करुन देत आहे.अधिग्रहणाची ११४ प्रकरणे प्रलंबितविहीर अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतस्तरावरुन दाखल झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी ११४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यात गंगाखेड तालुक्यात ५४, पालम तालुक्यात ३१, पूर्णा ८, जिंतूर १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रस्तावांपैकी गंगाखेड तालुक्यातील २१ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर तर ३३ प्रस्ताव तहसीलदारांच्या स्तरावर प्रलंबित आहेत.पालम तालुक्यातील ३१ प्रलंबित प्रस्तावांपैकी गटविकास अधिकारी स्तरावर २० आणि तहसील स्तरावर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. पूर्णा तालुक्यात ८ प्रस्ताव प्रलंबित असून त्यातील ५ गटविकास अधिकारी स्तरावर तर ३ तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. जिंतूर तालुक्यातील १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत. गटविकास अधिकाºयांकडे एकूण ६७ प्रस्ताव प्रलंबित असून तहसीलस्तरावर प्रलंबित प्रस्तावांची संख्या ४७ एवढी आहे.१६ टँकरद्वारे पाणीपुरवठाटंचाईग्रस्त गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १६ गावांना टँकरचे पाणी दिले जात आहे. त्यात गंगाखेड तालुक्यामध्ये खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा या चार गावांमध्ये टँकर सुरु झाले आहे. पालम तालुक्यात रामापूर व रामापूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी या गावांमध्ये ६ टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्यात नाव्हा येथे दोन तर चाटोरी येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्णा तालुक्यात ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून त्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई-लासिना, लोण खु. आणि आहेरवाडी या गावांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यात मांडवा या गावात टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक