शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी जिल्हा : ३२ लाख वृक्षांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:26 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे़ या अंतर्गत २०१६ यावर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजना राबविली़ यामध्ये परभणी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़त्यानुसार १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणी वृक्षांची लागवड केली़ त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ या दोन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे़२०१७ च्या पावसाळ्यामध्ये राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले़ या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ७ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध विभागांनी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले़२०१८ या वर्षासाठी जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशू संवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, गृह (कारागृह) ३ हजार, उर्जा विभाग ४० हजार ५००, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वन विभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ हजार ८३९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास व उद्योजकता (आयटीआय) ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्ह्याला एकूण ३२ लाख ४० हजार ८ चे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ हे उद्दिष्ट संबंधित विभाग पूर्ण करतात की कागदावरच वृक्षारोपण करून उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दिखावा करतात? याकडे संबंधित विभागांनी कटाक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार