शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

परभणी जिल्हा : ३२ लाख वृक्षांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:26 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे़ या अंतर्गत २०१६ यावर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजना राबविली़ यामध्ये परभणी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़त्यानुसार १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणी वृक्षांची लागवड केली़ त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ या दोन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे़२०१७ च्या पावसाळ्यामध्ये राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले़ या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ७ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध विभागांनी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले़२०१८ या वर्षासाठी जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशू संवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, गृह (कारागृह) ३ हजार, उर्जा विभाग ४० हजार ५००, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वन विभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ हजार ८३९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास व उद्योजकता (आयटीआय) ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्ह्याला एकूण ३२ लाख ४० हजार ८ चे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ हे उद्दिष्ट संबंधित विभाग पूर्ण करतात की कागदावरच वृक्षारोपण करून उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दिखावा करतात? याकडे संबंधित विभागांनी कटाक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार