शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

परभणी : निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:36 IST

गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.पुढील आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अधिकाºयांच्या बदल्यानांही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने १६ जानेवारी २०१९ रोजी अधिकाºयांच्या बदल्याच्या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. त्या आदेशामुळे काही अधिकारी संभ्रमात सापडले आहेत. या आदेशात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, ज्या अधिकाºयावर गुन्हे दाखल झाले आहेत व त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या अधिकाºयांना निवडणुकीशी संबंधित कामे देण्यात येऊ नयेत. त्यामुळे अशा अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही अधिकाºयांनी, निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल असतील तर कामे देऊ नयेत, असाही या आदेशाचा अर्थ काढला आहे. त्यामुळे अधिकाºयांमध्येच याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे काही अधिकाºयांवर गुन्हे दाखल असताना त्यांची निवडणुकीच्या कामाच्या मुख्य प्रवाहात बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकाºयांना त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे कारण पुढे करुन निवडणुकीशी संबंधित त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अधिकारीही संभ्रमात सापडले आहेत.या प्रकरणी आता निवडणूक आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाºयांनी आदेशाबाबत स्पष्टता आणावी, अशीही अपेक्षा या अधिकाºयांमधून व्यक्त होत आहे.२४ मार्च रोजी ग्रा.पं.च्या पोट निवडणुका४एप्रिल २०१९ ते जून २०१९ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या सरपंचपदाच्या पोट निवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. तसेच दोन गावांमधील सरपंचाच्या रिक्त पदासाठी थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारी रोजी काढले आहेत. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. ५ मार्चपासून अर्ज दाखल करता येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकParliamentसंसदgram panchayatग्राम पंचायत