शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

परभणी : बेशिस्त वाहनचालकांचा नागरिकांना त्रास, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; किरकोळ अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:45 IST

बेशिस्त वाहनचालकांची संख्या शहरात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. काही वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. त्यांच्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. कान आणि खांद्यामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविण्याची कसरत सध्या अन्य वाहनधारकांची डोकेदु:खी ठरत आ

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बेशिस्त वाहनचालकांची संख्या शहरात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. काही वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. त्यांच्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. कान आणि खांद्यामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविण्याची कसरत सध्या अन्य वाहनधारकांची डोकेदु:खी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने शहरात स्टिंग आॅपरेशन केले. यामध्ये शहरातील वाहनधारकांना आपल्या जीवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा वाटत असल्याचे दिसून आले.परभणी शहरात मागील काही दिवसांपासून किरकोळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे. तसेच शहरातील प्रमुख चौक व रस्ते वाहतुकीने नियमित जाम होत आहेत. त्यातच कान आणि खांदामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविणाºयांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ३ ते ५ यावेळेत शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायणचाळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, उड्डाणपूल, जिल्हा परिषद, महाराणा प्रताप चौक, जाम नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिंतूररोड, वसमतरोड, गंगाखेडरोड आदी ठिकाणी सदर प्रतिनिधीने पाहणी केली. या पाहणीमध्ये बहुतांश ठिकाणी दुचाकीस्वार बिनदिक्कतपणे वाहने चालवितांना मोबाईलवर बोलताना आढळून आले. या दुचाकीस्वारामुळे अनेक ठिकाणी अन्य वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. या दुचाकीस्वारामुळे काही ठिकाणी तर अन्य वाहनधारकांना किरकोळ अपघातांनाही सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी तर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयासमोरुनच हे दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत वाहन चालवितांना आढळून आले. परंतु, जसे वाहतूक कर्मचारी गाडी चालविण्याचा परवाना विचारून तसेच ट्रीपलसीट असलेल्या वाहनधारकांवर कारवाई करतात, तसे मोबाईलवरुन बोलत जाणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुुळे याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी लक्ष देऊन वाहने चालविताना मोबाईलवर बोलणाºया वाहनधारकांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.