शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

परभणी : वादानंतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांत दिलजमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:32 IST

पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली.जिल्हा परिषद अध्यक्षांचा अवमान केल्याच्या कारणावरुन २९ आॅगस्ट रोजी सत्ताधारी जि.प. सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी जि.प. सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील रखडलेल्या पाझर तलावाच्या कामावरुन हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर राकाँचे गटनेते अजय चौधरी यांनी अंबरवाडी येथील पाझर तलावाचे काम का रखडले, याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्याकडे मागितली. मात्र ही माहिती सभागृहात देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने सदस्य संतप्त झाले. गोंधळ वाढत असल्याने सीईओ पृथ्वीराज यांनी या सभागृहात माझा अपमान होत असेल तर मी थांबणार नाही, अध्यक्षांनी मला जाण्याची परवानगी द्यावी, असे म्हणून ते सभागृहाबाहेर पडले. दुपारी अडीच वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत सभेचे कामकाज चालले असले तरी त्यात ठोस निर्णय झाले नाहीत. साधारणत: ४ वाजेच्या सुमारास सदस्य सभागृहाबाहेर पडले. या सर्व प्रकारानंतर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे यांनी अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर साधारणत: ५.३० वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज सभागृहात दाखल झाले. शासन आणि प्रशासन दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघांनी मिळून चांगले काम करु. प्रशासनाकडून काही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे पृथ्वीराज यांनी सभागृहासमोर सांगितले. त्यानंतर पदाधिकाºयांच्या वतीने जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनीही सदस्य प्रशासनाला सहकार्य करतील. जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी सदस्यांची नेहमी सकारात्मक भूमिका राहील, असे सांगितले. त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत पार पडले.विविध विषयांना मंजुरी४सायंकाळी सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. त्यात ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने असलेल्या विषयांना मंजुरीही देण्यात आली. आगामी काळात विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सभेचे कामकाज पूर्ण झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.अंबरवाडीच्या कामावरून होता वादअंबरवाडी येथील पाझर तलावाचे काम दोन वर्षांपासून सुरू होत नसल्याने सत्ताधारी सदस्यांमध्ये नाराजी होती. या संदर्भात २९ आॅगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेच्या दिवशी सदस्य आणि सीईओंमध्ये वाद झाल्याने सभा तहकूब झाली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी प्रकल्प अधिकारी प्रताप सवडे यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडला पडला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद