शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

परभणी : रस्ता खोदून काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:40 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण रस्ते आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे; परंतु, या योजनांंची अंमलबजावणी करताना मात्र संंबंधित अधिकारी, कर्मचारी उदासिन धोरण स्विकारत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना दर्जेदार रस्ते वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी ते टोकवाडी गावाकडे जाणाऱ्या अडीच कि.मी.च्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी तालुका, जिल्हा व लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला. संबंधित कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर हा रस्ता दोन्ही बाजूने खोदण्यात आला आहे.विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजुचीच माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यानंतर तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तर दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्यावरून घसरत आहेत. त्यामुळे टोकवाडी येथील ग्रामस्थांचे व पेडजाई मंदिराकडे जाणाºया ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी टोकवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव४गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी ते टोकवाडी या रस्त्याची पाहणी करून बंद पडलेल्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी टोकवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.४निवेदनावर नामदेव तांदळे, ज्ञानोबा फड, माणिक मुंडे, शिवा तांदळे, महेश तांदळे, बळीराम जाधव, बळीराम नागरगोजे, राहुल फड, बालाजी जाधव, व्यंकटी नागरगोजे, बाळासाहेब मुंडे, प्रकाश नागरगोजे, ज्ञानोबा जाधव, संजय वडजकर, भानुदास जाधव, दीपक मगर, निवृत्ती जाधव, विठ्ठल तांदळे, आश्रोबा मुंडे, ज्ञानोबा चाटे, पिंटू जोगदंड आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस