शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

परभणी : खराब रस्त्यांमुळे डिझेल खर्चात २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:30 IST

शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एस.टी. महामंडळाची लालपरी नव्या रुपात आज रस्त्यावरुन धावत आहे. आधुनिक युगानुसार एस.टी. महामंडळाने आपल्या बसेसचे रुपडेही पालटले आहे. काही दिवसांपूर्वी शिवशाही, निमआराम आदी बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केल्या आहेत. सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एस.टी. महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. प्रवाशांना आपल्या परिसरातून बस मिळण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिंतूर, पाथरी, परभणी व गंगाखेड या चार ठिकाणी आगार स्थापन करण्यात आले आहेत. या आगारातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बस पोहोचविण्याचे काम करण्यात येते; परंतु, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील रस्ते खराब झाल्याने एस.टी. महामंडळाला याचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. परभणी-गंगाखेड, जिंतूर- परभणी, परभणी- वसमत आणि पाथरी- परभणी या चारही महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुख्य २० रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे एस.टी. महामंडळाच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक डिझेलच्या खर्चामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बसेस नादुरुस्त होणे, टायर लवकर खराब होणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्ही १ लाख कि.मी. प्रवासासाठी ५ टायर लागत होते; परंतु, त्याच बसला आता ६ टायर बदलावे लागत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला रस्त्यांच्या दुरावस्थेचा मोठा फटका बसत असल्याचे यंत्र अभियंता नगरसाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.२४ बस भंगारमध्ये४परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारातून २४ तास प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत; परंतु, काही बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत. या बसेसची दुरुस्ती चारही आगारातील दुरुस्ती विभागातून करण्यात येते. ज्या बसेसची दुरुस्ती आगारात होत नाही. त्या बसेस विभागीय नियंत्रक कार्यालयातील यंत्र विभागाकडे पाठविण्यात येतात.४याही ठिकाणी ज्या बसेस दुरुस्त होत नाहीत, अशा परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी व हिंगोली या सात आगारातील २४ बसेस एस.टी. महामंडळ प्रशासनाने भंगारामध्ये काढल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटीDieselडिझेल