शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

परभणी : खराब रस्त्यांमुळे डिझेल खर्चात २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:30 IST

शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एस.टी. महामंडळाची लालपरी नव्या रुपात आज रस्त्यावरुन धावत आहे. आधुनिक युगानुसार एस.टी. महामंडळाने आपल्या बसेसचे रुपडेही पालटले आहे. काही दिवसांपूर्वी शिवशाही, निमआराम आदी बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केल्या आहेत. सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एस.टी. महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. प्रवाशांना आपल्या परिसरातून बस मिळण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिंतूर, पाथरी, परभणी व गंगाखेड या चार ठिकाणी आगार स्थापन करण्यात आले आहेत. या आगारातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बस पोहोचविण्याचे काम करण्यात येते; परंतु, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील रस्ते खराब झाल्याने एस.टी. महामंडळाला याचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. परभणी-गंगाखेड, जिंतूर- परभणी, परभणी- वसमत आणि पाथरी- परभणी या चारही महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुख्य २० रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे एस.टी. महामंडळाच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक डिझेलच्या खर्चामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बसेस नादुरुस्त होणे, टायर लवकर खराब होणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्ही १ लाख कि.मी. प्रवासासाठी ५ टायर लागत होते; परंतु, त्याच बसला आता ६ टायर बदलावे लागत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला रस्त्यांच्या दुरावस्थेचा मोठा फटका बसत असल्याचे यंत्र अभियंता नगरसाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.२४ बस भंगारमध्ये४परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारातून २४ तास प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत; परंतु, काही बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत. या बसेसची दुरुस्ती चारही आगारातील दुरुस्ती विभागातून करण्यात येते. ज्या बसेसची दुरुस्ती आगारात होत नाही. त्या बसेस विभागीय नियंत्रक कार्यालयातील यंत्र विभागाकडे पाठविण्यात येतात.४याही ठिकाणी ज्या बसेस दुरुस्त होत नाहीत, अशा परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी व हिंगोली या सात आगारातील २४ बसेस एस.टी. महामंडळ प्रशासनाने भंगारामध्ये काढल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटीDieselडिझेल