शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

परभणी : संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:07 IST

राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यात संगणक परिचालक यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचा कारभार विस्कळीत झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यात संगणक परिचालक यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचा कारभार विस्कळीत झाला होता.संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळ नियुक्ती द्यावी, संगणक परिचालकांचा पगार चौदाव्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून द्यावा, परिचालकांचे थकीत मानधन अदा करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून संगणक परिचालक यांनी आंदोलनाला प्रारंभ केला.या आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, जिल्हाध्यक्ष वैभव एक्केवार, शरद वैरागर, पंढरीनाथ इक्कर, विजय शिंदे, सुरेश मोरे यांच्यासह संगणक परिचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाभरात ४२३ संगणक परिचालकांना आंदोलनात सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.मानवतमध्ये आंदोलन४मानवत : तालुक्यातील ४९ ग्रामपंचातीच्या संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ संगणक परिचालकांचे थकित वेतन द्यावे, शासन सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.४या आंदोलनात तालुकाध्यक्ष दत्ता पुरी, संतोष कापसे, महादेव शिंदे, विकास झेंडे, रमेश वाघ, संतोष यादव, ज्ञानेश्वर मस्के, शंकर चव्हाण, बापुसाहेब कदम, राम शिंदे, राजाराम भोरकडे, प्रशांत जाधव, गोपाळ होगे, आसाराम भोकरे, महेश कदम, विकास लाडाणे, विकास तुपसुंदरे, सर्जेराव शिंदे, संतोष नारळे आदी सहभागी झाले होते.परभणीत बेमुदत काम बंद आंदोलन४संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासूच परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हास्तरावर संगणक परिचालक म्हणून काम करणाºया परिचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.४या परिचालकांना एक-एक वर्षापासून मानधन मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मानधन दिले जात नाही. सध्या आॅनलाईनची कामे वाढली असून प्रत्येक ग्रामपंचायतीत कायमस्वरुपी संगणक परिचालकाची नियुक्ती करणे आवश्यक असताना शासन बोगस कंपन्यांची नियुक्ती करुन त्या माध्यमातून संगणक परिचालकांचे वेतन दिले जाते. या सर्व प्रश्नांमुळे आंदोलनाला प्रारंभ केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीITमाहिती तंत्रज्ञान