शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘शेतमाल तारण’बाबत उदासनिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:07 IST

राज्य शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांची उदासिनता पाहून सहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्या, असे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांची उदासिनता पाहून सहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्या, असे आदेश दिले.राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील शुक्रवारी परभणी दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतमाल तारण योजना व शासकीय खरेदी केंद्राबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम.डी. कापुरे, हिंगोलीचे जिल्हा उपनिबंधक तालुका खरेदी- विक्री संघाचे अधिकारी यांच्यासह विविध बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत पूर्णा, सोनपेठ, पालम, ताडकळस व बोरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतमाल तारण योजनेची अंमलबजवाणीच होत नसल्याचे समोर आले. त्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेचा सर्वाधिक म्हणजे पाथरी बाजार समितीने ८० शेतकºयांना लाभ दिला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही फक्त ६८ शेतकºयांनाच लाभ दिल्याची बाब यावेळी समोर आली. ही योजना सर्वसामान्य शेतकºयांपर्यंत पोहवा, असे आदेश यावेळी पाटील यांनी दिले. या योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतकºयांचाच शेतमाल स्वीकारला जातो. प्रत्यक्ष तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली आधारभूत खरेदी किंमत या पैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते. तारण कर्जाची मूदत १८० दिवसांची असून तारण कर्जावरील व्याजाचा दर फक्त ६ टक्के आहे. बाजार समितीने तारण कर्जाची १८० दिवसांच्या मुदतीत परतफेड केल्यास तारण कर्जावर ३ टक्के प्रमाणे व्याजाची आकारणी केली जाते. उर्वरित ३ टक्के व्याज बाजार समितीस प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येते. मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत दिली जात नाही.सहा महिन्यांच्या मुदतीनंतर पुढील सहा महिन्यापर्यंत ८ टक्के व्याजदर आणि त्यापुढील सहा महिन्यांकरीता १२ टक्के व्याजदर आकारणी केली जाते. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख तसेच सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते. शिवाय तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे, असेही यावेळी संबंधितांना सांगण्यात आले. शासनाची ही योजना शेतकरी हिताची असल्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ होईल, यासाठी अधिकाºयांनी लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.खरेदी केंद्र व चुकाºयाबाबत: घेतली माहितीसहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीमध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्राने शेतकºयांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची सद्य परिस्थितीबाबत माहिती घेतली. शेतकºयांनी विक्री केलेल्या शेतमालाच्या चुकाºयाबाबतचाही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना सूचना केल्या. त्यानंतर शेतकºयांच्या खरेदी केंद्राविषयी असलेल्या तक्रारी व शंकाचे निरासन करण्याच्या सूचना दिल्या. शेतमाल खरेदीबाबत शेतकºयांची गैरसोय होऊ नये, याकडे लक्ष देण्याचे आदेशित केले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार