शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

परभणी : अधिकाऱ्याअभावी योजनांची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:57 IST

येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़पालम शहरात गंगाखेड रस्त्यालगत शासनाचे तालुका कृषी कार्यालय कार्यरत आहे़ या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून पूर्णवेळ कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ मध्यंतरी जून महिन्यात तालुका कृषी अधिकारी पद भरण्यात आले होते़ परंतु, संबंधित अधिकाºयाने दोनच महिन्यातच बदली करून घेतल्याने हे पद रिक्त झाले आहे़ या रिक्त पदावर सहा महिने उलटले तरीही पूर्णवेळ अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आलेली नाही़ या ठिकाणचा पदभार गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी मस्के यांना इच्छा नसतानाही बळजबरीने देण्यात आला आहे़ त्यामुळे मस्के महिना महिना पालमच्या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ अतिरिक्त कारभार असल्याने त्यांना सोयरसुतक राहिलेले नाही़ पूर्णवेळ कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने शेतकºयांच्या विविध योजनांची वाताहत सुरू झाली आहे़ यामुळे अनेक योजनांवरून कर्मचारी व शेतकºयांत वाद होत आहेत़ जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे हे नेहमीच पालम तालुक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे जाब विचारावा तरी कोणाला, असा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे उभा आहे़कृषी आयुक्त एस़पी़ सिंह यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी पालम तालुकावासियांतून होत आहे़या योजनांवर होतोय परिणामराज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात़ शेती व्यवसायाबरोबरच जोड व्यवसायासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक समृद्धी साधतो़ परंतु, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील स्थिती मात्र वेगळी आहे़ राज्य शासन व कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाºया पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार, तुषार सिंचन, विद्युत मोटार वाटप इ. योजना सध्या सुरू असून, यातून शेतकºयांना लाभ मिळतो़ परंतु, या तालुक्याचा कृषी अधिकारी पदाचा पदभार रिक्त असल्याने या योजनाबाबत ना जनजागृती होते ना लाभ मिळतो़ त्यामुळे पालम तालुक्यासाठी उभारण्यात आलेले तालुका कृषी कार्यालय केवळ शोभेची वास्तू म्हणूनच उभे आहे की काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे़रिक्त पद भरण्याची मागणी४सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकºयांना व पशुपालकांना चारा, पाणी प्रश्नांसाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे़ परंतु, हे पद प्रभारी असल्याने गंगाखेड येथील तहसीलदार महिना-महिना या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून पालम तालुक्यासाठी कायमस्वरुपी अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती