शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

परभणी : अधिकाऱ्याअभावी योजनांची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:57 IST

येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़पालम शहरात गंगाखेड रस्त्यालगत शासनाचे तालुका कृषी कार्यालय कार्यरत आहे़ या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून पूर्णवेळ कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ मध्यंतरी जून महिन्यात तालुका कृषी अधिकारी पद भरण्यात आले होते़ परंतु, संबंधित अधिकाºयाने दोनच महिन्यातच बदली करून घेतल्याने हे पद रिक्त झाले आहे़ या रिक्त पदावर सहा महिने उलटले तरीही पूर्णवेळ अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आलेली नाही़ या ठिकाणचा पदभार गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी मस्के यांना इच्छा नसतानाही बळजबरीने देण्यात आला आहे़ त्यामुळे मस्के महिना महिना पालमच्या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ अतिरिक्त कारभार असल्याने त्यांना सोयरसुतक राहिलेले नाही़ पूर्णवेळ कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने शेतकºयांच्या विविध योजनांची वाताहत सुरू झाली आहे़ यामुळे अनेक योजनांवरून कर्मचारी व शेतकºयांत वाद होत आहेत़ जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे हे नेहमीच पालम तालुक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे जाब विचारावा तरी कोणाला, असा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे उभा आहे़कृषी आयुक्त एस़पी़ सिंह यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी पालम तालुकावासियांतून होत आहे़या योजनांवर होतोय परिणामराज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात़ शेती व्यवसायाबरोबरच जोड व्यवसायासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक समृद्धी साधतो़ परंतु, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील स्थिती मात्र वेगळी आहे़ राज्य शासन व कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाºया पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार, तुषार सिंचन, विद्युत मोटार वाटप इ. योजना सध्या सुरू असून, यातून शेतकºयांना लाभ मिळतो़ परंतु, या तालुक्याचा कृषी अधिकारी पदाचा पदभार रिक्त असल्याने या योजनाबाबत ना जनजागृती होते ना लाभ मिळतो़ त्यामुळे पालम तालुक्यासाठी उभारण्यात आलेले तालुका कृषी कार्यालय केवळ शोभेची वास्तू म्हणूनच उभे आहे की काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे़रिक्त पद भरण्याची मागणी४सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकºयांना व पशुपालकांना चारा, पाणी प्रश्नांसाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे़ परंतु, हे पद प्रभारी असल्याने गंगाखेड येथील तहसीलदार महिना-महिना या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून पालम तालुक्यासाठी कायमस्वरुपी अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती