शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

परभणी : अधिकाऱ्याअभावी योजनांची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:57 IST

येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़पालम शहरात गंगाखेड रस्त्यालगत शासनाचे तालुका कृषी कार्यालय कार्यरत आहे़ या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून पूर्णवेळ कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ मध्यंतरी जून महिन्यात तालुका कृषी अधिकारी पद भरण्यात आले होते़ परंतु, संबंधित अधिकाºयाने दोनच महिन्यातच बदली करून घेतल्याने हे पद रिक्त झाले आहे़ या रिक्त पदावर सहा महिने उलटले तरीही पूर्णवेळ अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आलेली नाही़ या ठिकाणचा पदभार गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी मस्के यांना इच्छा नसतानाही बळजबरीने देण्यात आला आहे़ त्यामुळे मस्के महिना महिना पालमच्या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ अतिरिक्त कारभार असल्याने त्यांना सोयरसुतक राहिलेले नाही़ पूर्णवेळ कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने शेतकºयांच्या विविध योजनांची वाताहत सुरू झाली आहे़ यामुळे अनेक योजनांवरून कर्मचारी व शेतकºयांत वाद होत आहेत़ जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे हे नेहमीच पालम तालुक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे जाब विचारावा तरी कोणाला, असा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे उभा आहे़कृषी आयुक्त एस़पी़ सिंह यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी पालम तालुकावासियांतून होत आहे़या योजनांवर होतोय परिणामराज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात़ शेती व्यवसायाबरोबरच जोड व्यवसायासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक समृद्धी साधतो़ परंतु, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील स्थिती मात्र वेगळी आहे़ राज्य शासन व कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाºया पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार, तुषार सिंचन, विद्युत मोटार वाटप इ. योजना सध्या सुरू असून, यातून शेतकºयांना लाभ मिळतो़ परंतु, या तालुक्याचा कृषी अधिकारी पदाचा पदभार रिक्त असल्याने या योजनाबाबत ना जनजागृती होते ना लाभ मिळतो़ त्यामुळे पालम तालुक्यासाठी उभारण्यात आलेले तालुका कृषी कार्यालय केवळ शोभेची वास्तू म्हणूनच उभे आहे की काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे़रिक्त पद भरण्याची मागणी४सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकºयांना व पशुपालकांना चारा, पाणी प्रश्नांसाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे़ परंतु, हे पद प्रभारी असल्याने गंगाखेड येथील तहसीलदार महिना-महिना या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून पालम तालुक्यासाठी कायमस्वरुपी अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती