शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

परभणी : प्राप्त याद्यांवर समिती घेणार निर्णय; आठ दिवसांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:01 IST

दिवाळीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पात्र शेतकºयांना कर्जमाफी झाल्याची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला याची अजूनही खात्री झाली नसून जिल्हास्तरावर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ पात्र शेतकºयांची अंतीम यादी घोषित करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दिवाळीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पात्र शेतकºयांना कर्जमाफी झाल्याची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला याची अजूनही खात्री झाली नसून जिल्हास्तरावर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ पात्र शेतकºयांची अंतीम यादी घोषित करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे़परभणी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ३२७ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत़ या अर्जांची यादी शासनाकडे गेली असून, त्यातून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना माफीचा लाभ दिला जाणार आहे़ दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरुपात शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले़ जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्ह्यातील २० शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप झाले़ असे असले तरी जिल्ह्यातील इतर शेतकºयांना मात्र माफीचा लाभ मिळाला की नाही? या विषयी संभ्रम आहे़ प्रत्यक्षात कर्जमाफीचे कामकाज अद्याप पूर्ण झाले नाही़ उपलब्ध माहितीनुसार शेतकºयांनी अपलोड केलेल्या अर्जांमधून ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन भागांत यादी तयार करण्यात आली आहे़ ही यादी तालुकास्तरीय समितीपर्यंत पोहचली आहे़ तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष असून, सहाय्यक निबंधक हे सहसचिव आहेत़तालुकास्तरीय समिती या संपूर्ण यादीची तपासणी करणार आहे़ प्रत्येक यादीतील शेतकºयांच्या नावासमोर या समितीला अ‍ॅप्रूव्ह किंवा डिसअ‍ॅपव्हू असे दोन पर्याय दिले असून, पात्र शेतकºयांना अ‍ॅप्रूव्हू केल्यानंतर कर्जमाफी झाल्याचा मॅसेज थेट शेतकºयांच्या मोबाईलवर जाणार आहे. तालुकास्तरीय समितीने कर्जमाफीच्या लाभातून अपात्र ठरविलेल्या शेतकºयांना त्यांचे आक्षेप उपविभागीय समितीकडे दाखल करता येतील़या समितीनंतर जिल्हास्तरीय समितीकडेही आक्षेप नोंदविता येतील. आयकर विभाग, शासकीय कार्यालय, सहकार निबंधक कार्यालय यांच्याकडून कर्मचारी, अधिकारी तसेच ५० हजरांपेक्षा अधिक कर भरणाºयांची यादी शासनाकडे उपलब्ध करण्यात आली असून, या यादीनुसार ग्रीन, येलो आणि रेड या गटांत शेतकºयांच्या अर्जांचे विभाजन करण्यात आले आहे़ त्यामुळे या तीनही गटांतून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी तयार होणार असून, त्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे़संकेतस्थळावर : मिळेना माहितीराज्यस्तरावरून शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांनी आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आहे का? याचा शोध सुरू केला़ विशेष म्हणजे सोशल मीडियातूनही कर्जमाफी झाल्याची माहिती कशी मिळवायची याविषयीच्या पोस्ट फिरत असल्याने अनेक शेतकºयांनी संकेतस्थळावर जावून नावाचा शोध घेतला़ परंतु, नाव नसलेल्या शेतकºयांची संख्याच अधिक असल्याचे दिसून आले़ त्यामुळे आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला की नाही? या विषयी शेतकºयांमध्ये संभ्रम आहे़ या सर्व पार्श्वभूमीवर परभणी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क केला असता कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्याच अजून तयार नसल्याची माहिती समोर आली आहे़बँकाही तयार करणार याद्यातालुकास्तरीय समितीला शेतकºयांच्या याद्या तीन गटांत प्राप्त झाल्या आहेत़ या याद्यांमधून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी तयार होईल़ दुसºया बाजुला बँका देखील ज्या शेतकºयांना कर्जमाफी द्यावयाची आहे, अशा शेतकºयांची खातेनिहाय याद्या तयार करणार असून, एकूण शेतकरी, एकूण खाते क्रमांक आणि त्यावर कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम अशी एकत्रित माहिती शासनाला कळविली जाणार आहे व कर्जमाफीसाठी लागणाºया रकमेची मागणी केली जाईल, ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतरच तो शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरेल़