शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

परभणी : न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत ३१ मार्चपर्यंत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:44 IST

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ न्यायालयांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते़ ही बाब लक्षात घेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार १७ मार्चपासून न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत केले जाणार असून, न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी १०़३० ते दुपारी २़३० पर्यंतची वेळ राहणार आहे़दुपारी २़३० नंतर न्यायालयांमध्ये कोणीही थांबणार नाही़ या संदर्भाने अधीक्षक व सहाय्यक अधिक्षकांच्या मदतीने योग्य ती उपाययोजना करावी, या कालावधीत न्यायालयातील कर्मचारी आळीपाळीने न्यायालयात उपस्थित राहतील, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ कर्मचाऱ्यांचीही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या काळात जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, मनाई हुकूमाचे तातडीच्या आदेशाचे अर्ज, रिमांडचे कामकाज, स्थगन आदेश आदी अत्यंत महत्त्वाची कामेच करावीत, असे या आदेशात म्हटले आहे़तसेच दुपारी २़३० नंतर वकील संघ कार्यालय, उपहार गृह, न्यायालयीन परिसरात पक्षकार, वकील, कर्मचारी असे कोणीही थांबणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्या़ व्ही़व्ही़ बांबर्डे यांनी काढले आहेत़शासकीय कार्यालयात आवश्यक कामासाठीच या४गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया अभ्यंगतांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक किंवा निकडीचे काम असेल तरच शासकीय कार्यालयात यावे, कामाशिवाय नागरिकांनी या कार्यालयांमध्ये जाण्याचे टाळावे, अत्यावश्यक कामासाठी मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे़पिठलं-भाकर महाप्रसाद रद्द४परभणी शहरातील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे गत दहा वर्षापासून दर गुरुवारी भाविकांना देण्यात येणारा पिठलं-भाकरीचा प्रसाद कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून बंद करण्यात आला असल्याची माहिती मंदिर संस्थानचे प्रमुख प. पू. मकरंद महाराज यांनी दिली़ तसेच शहरातील अष्टभूजा देवी मंदिरात सकाळी ७़३० व सायंकाळी ७़३० वाजता नियमितपणे होणारी आरती या पुढे फक्त पुजारीच करणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या