शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नव्या नळ जोडणीसाठी शास्तीत सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:49 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेवर जास्तीत जास्त नळ जोडणी व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के तर नळ पट्टीच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील, अशी अपेक्षा वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेवर जास्तीत जास्त नळ जोडणी व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के तर नळ पट्टीच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील, अशी अपेक्षा वाढली आहे.शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर अधिकृत नळजोडणी दिली जात आहे. ही जोडणी घेण्यासाठी नागरिकांना मालमत्ता कर आणि नळपट्टीची थकबाकी जमा करणे बंधनकारक आहे. मनपाने चालू वर्षापर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचे मागणी बिल वाटप केले आहेत. त्यामध्ये थकीत व चालू कराची रक्कम दिली असून, विलंब शास्ती व अनाधिकृत बांधकामाची शास्ती नमूद केली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी अधिकृत नळ जोडणी घ्यावी, या उद्देशाने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या विलंब शास्तीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कराचा भरणा केल्यास मालमत्ता कराच्या विलंब शास्तीवर ५० टक्के आणि पाणीपट्टीच्या विलंब शास्तीवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे.बांधकामे अधिकृत करण्याचीही मुभा४शासनाच्या निर्णयानुसार ४ जानेवारी २००८ रोजी व त्या तारखेनंतर जे अवैध बांधकाम, पूर्न बांधकाम केले जाईल, अशा सर्व बांधकामांना अनाधिकृत बांधकामांची शास्ती आकारणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २००८ पूर्वी असणाऱ्या बांधकामधारकांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र या योजनाचा लाभ अनेक बांधकामधारकांनी घेतला नाही. त्यामुळे या बांधकामांच्या बिलांमध्ये अनाधिकृत बांधकामांची शास्ती नमूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाने आणखी एक संधी दिली असून, बांधकाम ४ जानेवारी २००८ पूर्वीचे असल्यास व त्याचे पुरावे सादर केल्यास अनाधिकृत बांधकामाची शास्ती कमी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांनी प्रभाग समितीमध्ये हे पुरावे सादर करुन शास्ती कमी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी