शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

परभणी : देश वाचविण्यासाठी एकत्र या- कन्हैय्या कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:39 IST

सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी २८ जानेवारी रोजी पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी मुजाहेद खान, कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, नगराध्यक्ष मीना भोरे, पं़स़सभापती कल्पना थोरात, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्राणी, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, तबरेज खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, युसूफोद्दीन अन्सारी, राजीव पामे, मोईज अन्सारी, राजेश ढगे, अलोक चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती़कन्हैय्या कुमार म्हणाले, लोकांना रोजगार पाहिजे आहे. नोकरी मागितली किंवा सुरक्षा मागितली तरी कागद मागितला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत एनआरसीची काय गरज आहे. एनआरसी, एनपीआर, सीएएच्या माध्यमातून नागरिकता काढून घेण्याचा डाव आखला जात आहे. हा कायदा गरीब हिंदुच्याही विरोधात आहे. तेव्हा या विरोधात विना हिंसा आंदोलन उभे करावयाचे असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविकात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी एनआरसी आणि सीएए हे कायदे कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे आहेत, हे सांगून मुस्लीम समाजाने या कायद्याच्या विरोधात आंदोलने करावीत; परंतु, ती अहिंसेच्या मार्गाने असावीत, असे सांगितले़ या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारCentral Governmentकेंद्र सरकार