शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

परभणी : देश वाचविण्यासाठी एकत्र या- कन्हैय्या कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:39 IST

सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी २८ जानेवारी रोजी पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी मुजाहेद खान, कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, नगराध्यक्ष मीना भोरे, पं़स़सभापती कल्पना थोरात, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्राणी, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, तबरेज खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, युसूफोद्दीन अन्सारी, राजीव पामे, मोईज अन्सारी, राजेश ढगे, अलोक चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती़कन्हैय्या कुमार म्हणाले, लोकांना रोजगार पाहिजे आहे. नोकरी मागितली किंवा सुरक्षा मागितली तरी कागद मागितला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत एनआरसीची काय गरज आहे. एनआरसी, एनपीआर, सीएएच्या माध्यमातून नागरिकता काढून घेण्याचा डाव आखला जात आहे. हा कायदा गरीब हिंदुच्याही विरोधात आहे. तेव्हा या विरोधात विना हिंसा आंदोलन उभे करावयाचे असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविकात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी एनआरसी आणि सीएए हे कायदे कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे आहेत, हे सांगून मुस्लीम समाजाने या कायद्याच्या विरोधात आंदोलने करावीत; परंतु, ती अहिंसेच्या मार्गाने असावीत, असे सांगितले़ या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारCentral Governmentकेंद्र सरकार