शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

परभणी : देश वाचविण्यासाठी एकत्र या- कन्हैय्या कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:39 IST

सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी २८ जानेवारी रोजी पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी मुजाहेद खान, कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, नगराध्यक्ष मीना भोरे, पं़स़सभापती कल्पना थोरात, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्राणी, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, तबरेज खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, युसूफोद्दीन अन्सारी, राजीव पामे, मोईज अन्सारी, राजेश ढगे, अलोक चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती़कन्हैय्या कुमार म्हणाले, लोकांना रोजगार पाहिजे आहे. नोकरी मागितली किंवा सुरक्षा मागितली तरी कागद मागितला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत एनआरसीची काय गरज आहे. एनआरसी, एनपीआर, सीएएच्या माध्यमातून नागरिकता काढून घेण्याचा डाव आखला जात आहे. हा कायदा गरीब हिंदुच्याही विरोधात आहे. तेव्हा या विरोधात विना हिंसा आंदोलन उभे करावयाचे असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविकात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी एनआरसी आणि सीएए हे कायदे कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे आहेत, हे सांगून मुस्लीम समाजाने या कायद्याच्या विरोधात आंदोलने करावीत; परंतु, ती अहिंसेच्या मार्गाने असावीत, असे सांगितले़ या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारCentral Governmentकेंद्र सरकार