शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एकाच दिवशी तीन ठिकाणी आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:09 IST

तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.परभणी तालुक्यातील आलापूर पांढरी येथे १४ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतातील कडब्याला आग लागली. पांढरी येथील शेषराव आबासाहेब धस यांनी शेतामध्ये कडब्याची गंजी करून ठेवली होती. दुपारच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामध्ये १ हजार कडबा, सोयाबीन भुश्याच्या पाच ते सात बॅग, स्प्रिंकलर सेट, नांगर, वखर आदी शेतीची औजारे जळून खाक झाली. सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, आग लागल्याची माहिती समजताच गावातून टंँकर बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ही आग इतर ठिकाणी पसरली नाही; परंतु, आगीत कडबा आणि इतर साहित्याचे नुकसान टळू शकले नाही.मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. तापमान वाढल्याने कडबा तसेच वाळलेल्या गवताला आग लागून शेती साहित्याचे नुकसान होत आहे. यापूर्वी पाथरी, सेलू, गंगाखेड, जिंतूर तालुक्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.वाघाळ्यात १० एकर ऊस जळून खाकच्पाथरी- तालुक्यातील वाघाळा येथील सदाशिव मुळे यांच्या शेतात आग लागून १० एकरवरील ऊस जळून खाक झाला. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.च्वाघाळा परिसरात कालव्याच्या बाजूने सदाशिव मुळे यांचे कुटुंबिय शेतात घर करून राहतात. त्यांनी १० एकरमध्ये उसाची लागवड केली आहे. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागून ऊस जळून खाक झाला.च्गावातील टँकरच्या सहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे ही आग घरापर्यंत पोहचली नाही. कोणी तरी आग लावली असावी, असा संशय मुळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी व्यक्त केला आहे. तसेच या आगीत ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.डिग्रसवाडीत कडबा जळालाच्सेलू- तालुक्यातील डिग्रसवाडी येथे लोंबकळलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत कडबा जळाल्याची घटना १४ मे रोजी घडली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वीज तारांच्या घर्षणाने बांधावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता ही आग वाढत गेली. या परिसरातील पाशू खॉ मन्नान खान पठाण यांच्या शेतात ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला.च्त्या शेजारील ठेवलेले सरपणही जळून खाक झाले. काही वेळातच सेलू नगरपालिकेची अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत साधारणत: दोन ते अडीच हजार कडबा जळाल्याने शेतकºयासमोर चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग