शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परभणी: व्हरांड्यात भरतात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:12 IST

मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी): मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे़ताडबोरगाव येथे जिल्हा परिषदेचीशाळा असून, या शाळेत मराठी व उर्दू माध्यमाचे २६० विद्यार्थी शिक्षण घेतात़ मे महिन्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला होता़ त्यावेळी शाळेतील तीन वर्ग खोल्यांची पत्रे वाºयाने उडून गेली़ त्यामुळे सद्यस्थितीला शाळेमध्ये केवळ ५ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत़ जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर वर्ग खोल्यांची अडचण प्रशासनासमोर निर्माण झाली़ त्यामुळे पहिली आणि दुसरीचा वर्ग एकत्रित भरविला जात आहे़ तर तिसरी आणि सहावीचा वर्ग आलटून पालटून व्हरांड्यात भरविला जातो़ त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ व्हरांड्यातील अपुरी जागा, पुरेशा भौतिक साधनांचा अभाव, आजुबाजूचा गोंगाट यामुळे विद्यार्थ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़पत्रे व भिंती झाल्या धोकादायक४सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शाळेच्या व्हरांड्यात छतावर टाकलेली पत्रे जागोजागी फुटलेली आहेत़४पाऊस पडल्यानंतर हे पत्रे गळतात़ संपूर्ण व्हरांड्यात पाणी साचते़ तसेच भिंतीही खिळखिळ्या झाल्या आहेत़४भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून, पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे़४शाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही दुरुस्ती संदर्भात शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे़जिल्हा परिषदेने सहा नवीन वर्ग खोल्या मंजूर केल्या असून, लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे़ हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत दोन सत्रांत शाळा भरविली जाईल़-विठ्ठल गुंगाने, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदSchoolशाळा