शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

परभणी शहर मनपा: विकासकामांसह प्रशासनही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:16 IST

मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परभणी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. शहर स्वच्छतेबरोबरच पाणीप्रश्न आणि प्रशासकीय समस्या वाढत चालल्या असून नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परभणी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. शहर स्वच्छतेबरोबरच पाणीप्रश्न आणि प्रशासकीय समस्या वाढत चालल्या असून नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.परभणी महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची २१ एप्रिल रोजी पदोन्नतीवर धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. आयुक्त राहुल रेखावार यांनी त्यांच्या कार्यकाळात परभणी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावली होती. या शिस्तीतच शहरातील विविध विकासकामे पार पडत होती. रेखावार यांची बदली झाल्यानंतर परभणी शहराला नवीन आयुक्त लवकरच आयुक्त रुजू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या बदलीला एक महिना झाला. अद्यापही नवीन अधिकारी मनपाला मिळाले नाहीत. सध्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आहे. परंतु, या महिनाभराच्या काळात महापालिकेचा कारभार संपूर्णत: विस्कळीत झाला आहे. शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांचा वेळीच निपटारा होत नसल्याने नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.शहरातील स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न या प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वच्छता अभियानाच्या काळात तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी महापालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना नियोजनबद्ध कामांचे वितरण केले होते. परिणामी दररोज शहरात नियमित स्वच्छता होत होती. नाल्यांची सफाई, कचºयाची विल्हेवाट आदी कामे रोजच्या रोज होत असल्याने शहर स्वच्छतेत भर पडली होती.सध्या मात्र ही कामे विस्कळीत झाली आहेत. प्रमुख रस्त्यांची स्वच्छता वगळता वसाहतीमधील स्वच्छतेसाठी कर्मचारी फिरकत नाहीत. नाल्यांची सफाई होत नाही. १५ दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. परंतु, मोठ्या नाल्यांची सफाईची मोहीम अजूनही हाती घेण्यात आली नाही. दुसरीकडे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला असून शहरातील अनेक प्रभागांमध्ये १२ दिवसांतून एक वेळा पाणी येत आहे. शहरासाठी मूबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचा टंचाई कृती आराखडाही पडून आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही टँकर सुरु झाले नाहीत. परिणामी शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन प्रमुख प्रश्नांबरोबरच फेरफार, बांधकाम परवाना, हस्तांतरण ही प्रमाणपत्रेही उपलब्ध होत नाहीत. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने या समस्या निर्माण झाल्या असून परभणी महापालिकेसाठी तातडीने पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.महिनाभरात विभागप्रमुखांची बैठकच झाली नाहीमनपा आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आहे. मात्र एक महिन्याच्या काळात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे एकवेळाही मनपात आले नाहीत. पूर्वी प्रत्येक आठवड्याला विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या जात होत्या. या बैठकांमध्ये शहर विकासाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय होत होते. तसेच अधिकाºयांना योग्य त्या सूचनाही दिल्या जात होत्या. मात्र महिनाभरापासून विभागप्रमुखांच्या बैठकाही झाल्या नाहीत. आयुक्त नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियंत्रण राहिले नसून महापालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी जागेवर उपलब्ध नसतात. परिणामी नागरिकांची कामे खोळंबत आहेत. तसेच शहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वांच्या फाईलींवर निर्णय होत नसल्याने या फाईली रखडल्या आहेत. मनपा कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन फाईल्स् सादर करीत आहेत. या एक महिन्याच्या काळात एकही धोरणात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे मनपाचा कारभार सध्या तरी ढेपाळल्याचे दिसत आहे.कर्मचाºयांचे पगार रखडलेमहापालिकेतील कर्मचाºयांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कंत्राटी कामगारांनी पगारासाठी आंदोलन केल्याने या कामगारांचा दोन महिन्यांचा पगार अदा करण्यात आला. परंतु, उर्वरित कर्मचाºयांचे पगार रखडले असून त्यांचे पगार करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही उदासीनता निर्माण झाली आहे. महिनाभरापूर्वी घरपट्टी आणि नळपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविली होती. आयुक्तांच्या बदलीनंतर ही मोहीमही ठप्प पडली असून महापालिकेला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorतहसीलदारWaterपाणी