शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

परभणी :बोंडअळी नियंत्रणासाठी नऊ गावांची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:30 IST

कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने २०१८-१९ च्या खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी जवळपास १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये १ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाची लागवड केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत शेंद्री बोंडअळीने यावर्षी कापसाचे क्षेत्र घटले; परंतु, ज्या शेतकºयांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. त्या शेतकºयांवर पश्चातापाची वेळ आली आहे. सध्या कापूस पीक फुल-पात्यात आहे. कापसाला बोंडे लागण्याआधीच वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकावर हल्ला चढविला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या पाहणीमध्ये शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.कापूस पिकावर झालेल्या शेंद्री बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा परिणाम कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाच्या वतीने क्रॉपसॅप अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकाची पाहणी करीत आहेत. कापूस उत्पादकांना या पाहणी दरम्यान मार्गदर्शन करुन वापरावयाची औषधी व खते याबाबत माहिती देत आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांमध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढविला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. निवडलेल्या गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने २ हजार हेक्टर क्षेत्रावर १८०० कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. या सापळ्यांच्या माध्यमातून कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.या गावांचा केला समावेशकृषी विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पायलट पथदर्शक प्लॉट अंतर्गत (क्रॉपसॅप) जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ९ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील पिंपळा, जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी, सेलू तालुक्यातील झोडगाव, मानवतमधील रामेटाकळी, पाथरीमधील झरी, गंगाखेड तालुक्यातील कौडगाव, सोनपेठ तालुक्यातील धामोनी, पालममधील पेठशिवणी तर पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या गावांचा समावेश आहे. या गावांमधील कापूस उत्पादकांच्या शेतामध्ये कृषी विभागाकडून कामगंध सापळे बसवून बोंडअळी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबद्दल नाराजीसध्या जिल्ह्यातील शेतकरी हा पाऊस व गुलाबी बोंडअळी या दोन नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झाला आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात क्रॉपसॅप अभियान राबविण्यात येत असले तरी कृषी विभागाकडून बोंडअळीचा अधिक प्रभाव गृहित धरुन जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी