शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :बोंडअळी नियंत्रणासाठी नऊ गावांची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:30 IST

कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने २०१८-१९ च्या खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी जवळपास १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये १ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाची लागवड केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत शेंद्री बोंडअळीने यावर्षी कापसाचे क्षेत्र घटले; परंतु, ज्या शेतकºयांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. त्या शेतकºयांवर पश्चातापाची वेळ आली आहे. सध्या कापूस पीक फुल-पात्यात आहे. कापसाला बोंडे लागण्याआधीच वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकावर हल्ला चढविला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या पाहणीमध्ये शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.कापूस पिकावर झालेल्या शेंद्री बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा परिणाम कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाच्या वतीने क्रॉपसॅप अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकाची पाहणी करीत आहेत. कापूस उत्पादकांना या पाहणी दरम्यान मार्गदर्शन करुन वापरावयाची औषधी व खते याबाबत माहिती देत आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांमध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढविला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. निवडलेल्या गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने २ हजार हेक्टर क्षेत्रावर १८०० कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. या सापळ्यांच्या माध्यमातून कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.या गावांचा केला समावेशकृषी विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पायलट पथदर्शक प्लॉट अंतर्गत (क्रॉपसॅप) जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ९ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील पिंपळा, जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी, सेलू तालुक्यातील झोडगाव, मानवतमधील रामेटाकळी, पाथरीमधील झरी, गंगाखेड तालुक्यातील कौडगाव, सोनपेठ तालुक्यातील धामोनी, पालममधील पेठशिवणी तर पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या गावांचा समावेश आहे. या गावांमधील कापूस उत्पादकांच्या शेतामध्ये कृषी विभागाकडून कामगंध सापळे बसवून बोंडअळी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबद्दल नाराजीसध्या जिल्ह्यातील शेतकरी हा पाऊस व गुलाबी बोंडअळी या दोन नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झाला आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात क्रॉपसॅप अभियान राबविण्यात येत असले तरी कृषी विभागाकडून बोंडअळीचा अधिक प्रभाव गृहित धरुन जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांमधून कृषी विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी