शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:57 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील चाटोरी हे गाव ६ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यातील पहिला टँकर चाटोरी गावाला सुरू झालेला आहे. गावाजवळील नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने शेतशिवारातील विंधन विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. रात्र जागून पाण्यासाठी चाटोरीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू केले आहे. या टँकरची क्षमता कमी असून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टँकरला पाण्यासाठी रावराजूर येथे जावे लागते. एका दिवसात केवळ दोन फेऱ्या होत आहेत. यातून जेमतेम २० हजार लिटर पाणी मिळत आहे. गावाला किमान दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी गोंधळ निर्माण होत आहे. त्या अगोदर चार-चार तास हंड्यांच्या रांगा लावून ठेवाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. दोन कि.मी. पायपीट करून घागरभर पाण्यासाठी कसरती करावी लागत आहे.नवीन टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष४चाटोरी गावची लोकसंख्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शासनाने टँकर दिले आहे. मात्र या टँकरवर गावाची तहान भागत नाही. पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अजून एक टँकर देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे; परंतु, अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर मंजूर न केल्यास या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाटोरी येथील सरपंच गंगाधर मस्के यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई