शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:57 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील चाटोरी हे गाव ६ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यातील पहिला टँकर चाटोरी गावाला सुरू झालेला आहे. गावाजवळील नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने शेतशिवारातील विंधन विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. रात्र जागून पाण्यासाठी चाटोरीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू केले आहे. या टँकरची क्षमता कमी असून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टँकरला पाण्यासाठी रावराजूर येथे जावे लागते. एका दिवसात केवळ दोन फेऱ्या होत आहेत. यातून जेमतेम २० हजार लिटर पाणी मिळत आहे. गावाला किमान दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी गोंधळ निर्माण होत आहे. त्या अगोदर चार-चार तास हंड्यांच्या रांगा लावून ठेवाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. दोन कि.मी. पायपीट करून घागरभर पाण्यासाठी कसरती करावी लागत आहे.नवीन टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष४चाटोरी गावची लोकसंख्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शासनाने टँकर दिले आहे. मात्र या टँकरवर गावाची तहान भागत नाही. पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अजून एक टँकर देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे; परंतु, अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर मंजूर न केल्यास या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाटोरी येथील सरपंच गंगाधर मस्के यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई