शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:57 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील चाटोरी हे गाव ६ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यातील पहिला टँकर चाटोरी गावाला सुरू झालेला आहे. गावाजवळील नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने शेतशिवारातील विंधन विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. रात्र जागून पाण्यासाठी चाटोरीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू केले आहे. या टँकरची क्षमता कमी असून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टँकरला पाण्यासाठी रावराजूर येथे जावे लागते. एका दिवसात केवळ दोन फेऱ्या होत आहेत. यातून जेमतेम २० हजार लिटर पाणी मिळत आहे. गावाला किमान दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी गोंधळ निर्माण होत आहे. त्या अगोदर चार-चार तास हंड्यांच्या रांगा लावून ठेवाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. दोन कि.मी. पायपीट करून घागरभर पाण्यासाठी कसरती करावी लागत आहे.नवीन टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष४चाटोरी गावची लोकसंख्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शासनाने टँकर दिले आहे. मात्र या टँकरवर गावाची तहान भागत नाही. पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अजून एक टँकर देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे; परंतु, अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर मंजूर न केल्यास या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाटोरी येथील सरपंच गंगाधर मस्के यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई