शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५ दिवसांत २३२ शस्त्रक्रियांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:24 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाला ग्रामीण आणि शहरी भागात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ठराविक उद्दिष्ट देण्यात येते. ही बाब पूर्णत: ऐच्छिक असल्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याच बरोबर आर्थिक लाभ व वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र तरी सुद्धा नागरिकांचा या शस्त्रक्रिया वेळेत करण्याकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले होते. ग्रामीण भागाला आरोग्य विभागाने दिलेले ३५१ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. उलट ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणमध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली. ग्रामीण रुग्णालयाला शहरासाठी ४१२ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा उजडला तरी ग्रामीण रुग्णालयामार्फत केवळ १८० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मार्च असल्याने ५ दिवसांत उर्वरित २३२ शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय कसे पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाची शिबीर आयोजित करुन समाधानकारक आकडा गाठता न आल्याने याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आणि उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अलिकडच्या काळात पाळणा लांबविण्यासाठी इंजेक्शन, कॉपर टी व इतर साधनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने अनेकजण कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील ग्रामीण भाग आघाडीवर४शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची कामगिरी सरस असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्राथामिक आरोग्य केंद्र कोल्हांतर्गत १८४ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते.४या ठिकाणी उद्दिष्टापेक्षा जास्तीच्या ७४ शस्त्रक्रिया अशा एकूण २६० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्राथामिक आरोग्य केंद्र रामपुरींतर्गत १६७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. याठिकाणी १५८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.४त्यामुळे ग्रामीण भागात ३५१ चे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याच्या बाबती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.एका ही पुरुषावर शस्त्रक्रिया नाहीअनेकदा पुरुषी मानसिकतेतून स्त्रियांना डावलण्याचा प्रयत्न होतो. मात्र कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया स्त्रियांवरच लादल्या जातात. राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रात महिलांच्या पुढे-पुढे करणारे पुरुष शस्त्रक्रियेच्या बाबतीत कारभारणीच्या मागे असल्याचे चित्र आहे. अलिकडच्या काळात तालुक्यात एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार