शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:13 IST

या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन समग्र शिक्षा अभियान राबविते. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाळेपासून घर दूर असलेल्या पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची निवासाची नि:शुल्क सोय करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला होता. या वसतिगृहासाठी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील जागा निवडण्यात आली होती. या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन या ठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एका वर्षाची कालावधी उलटून गेला तरी वसतिगृह सुरु झाले नाही. सद्य स्थितीत ही इमारत शोभेची वास्तू बनली आहे. या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.७० ते ८० विद्यार्थिनींनी नोंदणीही केली होती. मात्र वसतिगृह सुरु झाले नसल्याने या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती. या ठिकाणी कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने निवासासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने मुलीना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलीची तात्पुरती निवासाची व्यवस्था झाली नाही, अशा नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींना आपल्या गावातून प्रवास करुन विद्यालय गाठावे लागत होते. काही विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने त्यांना मुलींचे शिक्षण थांबवावे लागत आहे.त्यामुळे पुढील वर्षातील शैक्षणिक सत्रात तरी वसतिगृह सुरु करावे, अशी मागणी विद्यार्थिनी, पालकातून होत आहे.इमारत पूर्ण; सुविधांचा अभाव४या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी लागणारे फर्निचर, खाट उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या वसतिगृहासाठी गृहपाल, चौकीदार, स्वयंपाकी, सहाय्यक ही पदे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात देऊन भरण्यात येणार आहेत. याबाबतची निवड प्रक्रियाच सुरु झाली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक वर्षात तरी रहाण्याची सुविधा उपलब्ध देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या घटकाला: होतोय लाभ१४ ते १८ वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय तसेच दारिद्ररेषेखालील कुटुंबातील इयत्ता ९ वी आणि १२ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींचा गट हा या योजनेचा लक्ष्य गट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जातो . किमान ५० टक्के विद्यार्थिनी या अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आदी घटकातील असाव्यात असा आदेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र