शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:13 IST

या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन समग्र शिक्षा अभियान राबविते. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाळेपासून घर दूर असलेल्या पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची निवासाची नि:शुल्क सोय करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला होता. या वसतिगृहासाठी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील जागा निवडण्यात आली होती. या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन या ठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एका वर्षाची कालावधी उलटून गेला तरी वसतिगृह सुरु झाले नाही. सद्य स्थितीत ही इमारत शोभेची वास्तू बनली आहे. या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.७० ते ८० विद्यार्थिनींनी नोंदणीही केली होती. मात्र वसतिगृह सुरु झाले नसल्याने या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती. या ठिकाणी कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने निवासासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने मुलीना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलीची तात्पुरती निवासाची व्यवस्था झाली नाही, अशा नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींना आपल्या गावातून प्रवास करुन विद्यालय गाठावे लागत होते. काही विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने त्यांना मुलींचे शिक्षण थांबवावे लागत आहे.त्यामुळे पुढील वर्षातील शैक्षणिक सत्रात तरी वसतिगृह सुरु करावे, अशी मागणी विद्यार्थिनी, पालकातून होत आहे.इमारत पूर्ण; सुविधांचा अभाव४या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी लागणारे फर्निचर, खाट उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या वसतिगृहासाठी गृहपाल, चौकीदार, स्वयंपाकी, सहाय्यक ही पदे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात देऊन भरण्यात येणार आहेत. याबाबतची निवड प्रक्रियाच सुरु झाली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक वर्षात तरी रहाण्याची सुविधा उपलब्ध देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या घटकाला: होतोय लाभ१४ ते १८ वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय तसेच दारिद्ररेषेखालील कुटुंबातील इयत्ता ९ वी आणि १२ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींचा गट हा या योजनेचा लक्ष्य गट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जातो . किमान ५० टक्के विद्यार्थिनी या अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आदी घटकातील असाव्यात असा आदेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र